सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
आज सकाळी वीर धरण भरल्यानंतर दुपारी २ वाजता साडेचार हजार क्यूसेस, दुपारी चार वाजता १४ हजार क्यूसेस तर आज सायंकाळी सहा वाजता २३ हजार क्यूसेसने नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.