सोमेश्वर रिपोर्टर टिम - - -
बारामती दि ९
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरामध्ये दि ९ रोजी दुपारपासूनच अवकाळी पावसाची चिन्हे दिसत येत होती संध्याकाळी ७.१८ वा सोमेश्वरनगर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन पिक काढणीच्या हंगामात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे .हवामान खात्याकडून पुढील एक दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसाचा कांदा, मक्का, बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा या सारख्या पिकांना मोठा फटका बसु शकतो. त्यामुळे बळीराजा पुढे संकट पुन्हा आ वासून उभे आहे
शेतकरी संकटात. . . .
गेले वर्षभर शेतकऱ्यांच्या मागील संकटाची मालिका कायम आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीचा मोठा फटका सोयाबीन, बाजरी, कापूस यासारख्या खरीप हंगामातील पिकांना बसला होता. अतिवृष्टीमुळे पिके नष्ट झाली होती. या परिस्थितीतून सावरत शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी शेतात पेरणी केली. पिकांना वाढवले मात्र, आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावणार का ?. या अवकळी पावसाचा फटका हा गहू, उन्हाळी बाजरी, कांदा, हरभारा या सारख्या पिकांना बसले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
COMMENTS