तरडोली भागात आठ दिवसापासून बत्ती गुल : पिण्याच्या पाण्याचे हाल
मोरगांव : प्रतिनिधी
तरडोली ता . बारामती नजीक पवारवाडी येथील थ्री फेज लाईट आठ दिवसापासुन बंद आहे . तर पिण्याच्या पाण्याची जलवाहीनी वाहुन गेल्यामुळे माणसांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी ओढ्याचा आधार घ्यावा लागत आहे .
सलग पडलेल्या पावसामुळे मोरगांव परीसरात विद्युत रोहीत्राचा खेळखंडोबा होत आहे .तरडोली नजीक पवारवाडी येथील ११ केव्हीचे रोहीत्र तीन दिवस बंद होते . सध्या सिंगल फेज लाईट सुरु झाली आहे. मात्र थ्री फेज आठ दिवसापासून बंद आहे . थ्रीफेज लाईटमुळे विहारीतुन विज पंपाद्वारे जनावरांना लागणारे पाण्याच्या थेट पाईपलाईन शेतकऱ्यांनी गोठ्यापर्यत केल्या आहेत . मात्र थ्री फेज लाईट नसल्याने येथील शेतकऱ्यांच्या 'धरण पायथ्याशी तर ओढा हाताशी ' असुनही पिण्याच्या पाण्यासाठी ओढा ईतर गावांचा आधार घ्यावा लागत आहे .
ग्रामपंचायतीची येणारी पिण्याच्या पाण्याची जलवाहीनी तुकाईनगर येथून वाहून गेली आहे . यामुळे येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मोरगांव अथवा तरडोली गावठाणातुन मोटार सायकलवर पाणी आणावे लागत आहे . तर दुभत्या गाईंनासाठी पिण्याचे पाणी बैलगाडीद्वारे आणावे लागत आहे . जनावरांसाठी कडबाकुटीसाठी लागणारी सिंगल फेज लाईटही तब्बल तीन दिवस नसल्याची खंत येथील शेतकरी बाबासो पवार यांनी व्यक्त केली . विज वितरण कंपनीचे कर्मचारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याची खंत पवार यांनी सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना व्यक्त केली .
COMMENTS