सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
काटेवाडी : प्रतिनिधी
बिबट्याच्या दहशतीनंतर गेल्या दोन वर्षांपासून भयमुक्त झालेला काटेवाडी परिसर आत्ता रानगव्यांच्या वावरामळे पुन्हा भययीत झाला आहे. काटेवाडीपासून जवळच असलेल्या ढेकळवाडी परिसरातील एका ऊसाच्या शेतात दोन रानगवे शेतकऱ्यांनी पाहिले.
ढेकळवाडी परिसरातील अंकुश रामचंद्र ठोंबरे यांनी व त्यांचे मित्र अमोल वरे हे आज (दि ३१) दोघे जण सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान द्राक्ष बागेत बसले होते. त्यावेळी काही अंतरावर असलेल्या ऊसाच्या शेतात दोन गवे चरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या दोन गव्यांचे फोटो देखील काढली आहेत. या घटनेची माहिती त्यांनी जवळच्या शेतकऱ्यांना फोनवरून दिली. या घटनेमुळे काटेवाडी व ढेकळवाडी परिसरातील शेतकरी घाबरले आहेत.
दरम्यान, काटेवाडी व कन्हेरी परिसरात गेली दोन वर्षापूर्वी बिबट्यांनी दहशत निर्माण केली होती. वनविभागाने या परिसरातील दोन बिबटे जेरबंद केले होते. मात्र, आज रानगवे आढळल्याने त्याला रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी जाण्यासही शेतकरी घाबरले आहेत.
COMMENTS