सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील फॉरेस्ट कार्यालयात गेल्या कित्येक वर्षां पासून वरिष्ठांच्या आणि लोक प्रतिनिधींच्या आशिर्वादाने वनरक्षकांची टोळी ठाण मांडून बसल्याने ते वन विभागाचे कायदे धाब्यावर बसवून गेल्या कित्येक वर्षां पासून लाखो रुपयांची लुट करताना दिसुन येत आहेत यांचे वाई तालुक्यातील आणि पर जिल्ह्यातील विना परवाना झाडे तोडणार्या वखार मालकांचे घनिष्ठ संबंध आहेत.
त्यांच्या बरोबर आर्थिक देवान घेवान करुन त्यांची वाहने पकडली जाऊ नयेत याची काळजी घेताना दिसत असतात. वरिष्ठ अधिकार्यांनी विना परवाना झालेल्या वृक्षतोडची वाहतुक करणार्या चालकासह मालका वर कारवाई करण्याचे ठरविल्यास हि टोळी वरिष्ठांच्या विरोधात जाऊन वखार मालकाला गेल्या कित्येक वर्षा पासुन मदत करताना दिसतात खबर्या मार्फत मिळालेल्या माहिती नुसार अधिकारी वर्गांने कारवाई करण्याचे धाडस केले तर हे भ्रष्टाचारी
वनरक्षक एकत्रीत येऊन साहेबालाच कायमचा घरचा रस्ता दाखविण्या साठी त्याच्या विरुद्ध लाचलुचपत विभागा कडे वखार मालकांन सह वन्य प्राण्यांची विना परवानगी शिकार करणारी टोळी हाताशी धरून तक्रारी करण्याच्या धमकीचे फटकारे देवुन त्या अधिकार्यांचे मनोधैर्य खचवायचे .प्रसंगी तालुक्याचे आमदार यांच्या कडे खोट्या तक्रारी करून अधिकारी वर्गांला बदनाम करुन या टोळीने आज पर्यंत लाखो रुपयांची माया गोळा केल्याची चर्चा गेल्या कित्येक वर्षां पासून वाई तालुक्यात सुरु आहेत . अधिकारी वर्गांला सहकार्य न करणे अशा विविध पद्धतीच्या प्रयोगाने वाईचे फॉरेस्ट कार्यालय ग्रासले आहे .वाई तालुक्यातील अनेक गावांन मध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारी होत असतात त्याची माहिती या तडफदार पण भ्रष्टाचारी वनरक्षकांना मिळत असते साहेबाला अंधारात ठेऊन हि तडफदार टोळी घटना स्थळावर पोहचते आणी मॉस खाणार्यांना फटकारते तेथेच लक्ष्मीचा उगम होतो याचा साहेबाला तर ठांगपत्ताही नसतो .या कर्यालयात गेल्या अनेक वर्षां पासून शनिवार रविवार या दोन दिवसांच्या सुट्टीमध्ये दलालांच्या बैठका असतात .या बैठकांना कार्यालयातुन कोणी विरोध करु नये म्हणून हि टोळी कार्यालयातील कर्मचार्यांना धमकावित
असते . खात्याशीश गद्दारी करणार्या व वाईच्या फॉरेस्ट कर्यालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून रुस्तम झालेल्यांना तांदुळातील खड्या प्रमाणे वेचुन त्यांची सखोल चौकशी करुन निलंबनाची
सातारा येथील फॉरेस्ट कार्यालयातील वरिष्ठांनी
करावी अशी मागणी होत आहे .
वास्तविक पाहता कुठल्याही शासकीय कार्यालयात ३ ते ४ वर्षा नंतर बदली करणे हा शासकीय नियम असताना देखील हा नियम वाई येथील फॉरेस्ट
कार्यालयातील कर्मचार्यांना का लागु होत नाही असा संतप्त सवाल वाई तालुक्यातील नागरीकांन मधुन विचारला जात आहे . वाई शहरात असणार्या फॉरेस्ट कार्यालयाला एक ऐतिहासिक परंपरा आहे येथील सह्याद्रीच्या डोंगरांगा नेहमीच हिरवाईने नटलेल्या असतात
पावसाळ्यात या नटलेल्या डोंगर रांगा पाहण्या साठी देश विदेशातील अनेक पर्यंटक आवर्जून भेटी देताना दिसतात या वैभवातील अनेक वृक्षांची बेसुमार कत्तल करुन ति पर जिल्ह्यातील व्यापारी किंवा वखार मालकाला
सोपविण्याचे सोपस्कार काम हि टोळी करीत असते. या मनमानी करणार्या टोळीला सातारच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लागाम लावुन निलंबित करावे
अशी मागणी जोर धरीत आहे .