सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
मोरगाव : प्रतिनिधी
जेजुरी - बारामती या जिल्हा मार्ग क्र ६५ चे अंतर ५० किमी आहे. या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे . मात्र नव्याने झालेल्या या रस्त्यामुळे वाहन चालकांच्या गाडीला वेगाचा लगाम नसल्याने हा रस्ता म्रुत्युचा सापळा बनला आहे. गेल्या दोन दिवसात पाच व्यक्तींचा म्रुत्यु तर चार गंभीर जखमी आहेत .
यापुर्वी जेजुरी वरुन बारामती कडे जाणारा रस्ता जागोजागी खड्डे , उखडलेले डांबर व अरुंद होता . यामुळे रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेले काम पुर्ण झाले आहे. भरधाव वेगाने अवघ्या ४० मिनिटांच्या कालावधीतच बारामतीवरुन जेजुरीपर्यंत पोहचता येत आहे . उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गुणवत्तापूर्वक रस्ता बांधणी कामाकडे असणारे लक्ष व यामुळे ठेकेदाराने गुणवत्तापूर्वक केलेले काम यामुळे या रस्त्यावरील खाजगी व मालवाहतूक वाढत चालली आहे .तसेच रस्त्याच्या बाजुला नव्याने छोटे मोठे असंख्य उद्योग धंदे निर्माण झाले आहेत .
मात्र हा रस्ता म्रुत्युच सापळा बनत चालला आहे . रस्त्याच्या बाजूला वळण , उतार , चढ , शाळा , गाव , चौक आदी दिशादर्शक फलक नसल्याने आठवड्याला दोन - तीन अपघात घडत आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्वस्त कोत आहेत. वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत . वाहनांना वेगाचा लगाम नसल्याने गेल्या दोन दिवसांत पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहेत . तर गेल्या सात दिवसांत झालेल्या अपघातात तीन व्यक्ती गंभीर जखमी आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष पुरवुन जागोजागी गतीरोधक व दिशा दर्शक फलक लावण्याची मागणी पश्चिम भागातील सरपंच व ग्रामस्थ यांकडून होत आहे .
------------------------
अत्यंत वेगाने भरधाव गाड्यांमुळे पिसर्वे येथील दांपत्य , मेडद येथील एका जेष्ठ नागरीकाचा ,तर मोरगाव येथील दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे . तर याच रस्त्यावर झालेल्या अपघातात लोणी भापकर व मोरगाव येथील चार व्यक्ती गंभीर जखमी आहेत