सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
हिवरे (ता. पुरंदर )येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित लोकनेते शिवाजी (आप्पा)पोमण यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, भिवरी गावचे सामाजिक कार्यकर्ते,माजी सरपंच , पुरंदर तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीप सदाशिव कटके यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे व उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, ईश्वर बागमार, निलेश जगताप, साकेत जगताप, भानुकाका जगताप, संतोष जगताप, संदीप देवकर, दिलीप थोपटे, सचिन पठारे, दत्तात्रय काळे, संजय कटके, संदीप कटके, संदीप पायगुडे, जालिंदर वाडकर, मदनराव शिंदे, संजय जवळकर, मारुती केंद्रे, कुंडलिक मेमाणे, सुधाकर जगदाळे,मारुती कटके,
दत्ता काळे , संदीप कटके, नाथाभाऊ कटके,जगन्नाथ कटके, म्हस्कूशेठ दळवी, म्हस्कू रा. कटके,दादा कटके ,नामदेव ढवळे, किरण कटके, सागर कटके, शेखर कटके, मनोहर घिसरे ,विजय ढवळे ,तुकाराम कटके, उत्तम कटके, विकास कटके, अविनाश कटके ,योगेश कटके, संदीप गायकवाड, नामदेव कुंजीर, दत्तात्रय कटके ,बाबू कटके, हनुमंत साळुंके, जयवंत साळुंखे, जालिंदर वाडकर, शिवाजी पवार, दत्तानाना गायकवाड , सुनील लोणकर,सुभाष लोणकर ,राजेंद्र ताम्हाणे ,मनोज वाडकर ,कैलास कटके, गणेश ज.कटके,विकास कटके ,दत्ता कामठे ,अतुल शिर्के, सौरभ कटके ,संदेश पवार, नवनाथ भिसे , ईश्वर कटके, मोतीराम कटके, गणेश कटके, सुशील ढवळे, अनिल ढवळे ,प्रकाश कटके, संतोष कटके, शिवाजी कटके मोहन कटके, ग्रामविकास अधिकारी रमेश राऊत, पुणे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नेते नवनाथ भिसे,संजय कटके,हिवरेचे सरपंच पूनम कामठे, शांताराम गायकवाड, गुलाब गायकवाड, सुदर्शन गायकवाड, रामदास कुदळे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी शिवाजी पोमणे यांच्या पत्नी क्षमा पोमण, मुले शरयू पोमण, सतेज पोमण, शलाका पोमण आदी उपस्थित होते.
घरादारावर तुळशी पत्र ठेवून, समाजाची नियमित सेवा केली पाहिजे, त्याची आठवण ठेवली पाहिजे, ही जबाबदारी माझी आहे. शिवाजी (आप्पा) पोमण यांचे कार्यकर्ता म्हणून अप्रतिम कार्य आहे, त्यांचे चार वर्षापुर्वी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुले समाजाची फार मोठी हानी झाली. त्यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता व आदर्श सरपंच पुरस्कार समारंभ हा सातत्याने पुढेही चालू राहील. जालींदर कामठे यांनी सांगितले.
पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी दिगंबर दुर्गाडे सुनील चांदेरे यांची अभ्यासपूर्ण भाषणे झाली.
यावेळी आदर्श सरपंच पुरस्कार सोमुर्डी गावच्या सरपंच सौ. मंदाकिनी शांताराम शेंडकर व राजुरी गावचे माजी सरपंच उद्धव भाऊसाहेब भगत यांना प्रदान करण्यात आला.