सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सातारा : प्रतिनिधी
सातारा शहराजवळील कोडोली येथे जुन्या भांडणाच्या कारणातून लाकडी दांडक्याने मारहाण करुन एका तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, या मारहाणीत अक्षय दिलीप माने (रा. धनगरवाडी, ता. सातारा) याचा खून झाला आहे. तर याप्रकरणी तरुणाची बहीण दीपाली जितेंद्र केंजळे (रा. कवठे, ता. कहऱ्हाड) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार पोलिसांनी धनंजय यादव (पूर्ण नाव नाही), प्रथमेश उर्फ पत्या रमेश चव्हाण, योगेश नंदकुमार खवळे, रोहन नामदेव जाधव आणि अन्य एकजण (सर्व रा. कोडोली, सातारा) यांच्या
विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दि. २९ मे रोजी दुपारपासून रात्री ११ वाजेच्या दरम्यान हा प्रकार कोडोलीतील पाच एकराचा प्लॉट येथे घडली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरुन अक्षय माने याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. डोके, पाठ, हात, पायावर दांडके मारण्यात आले. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने अक्षय याचा मृत्यू झाला. हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी शोध घेऊन तिघां संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दि. २९ मे रोजी दुपारपासून रात्री ११ वाजेच्या दरम्यान हा प्रकार कोडोलीतील पाच एकराचा प्लॉट येथे घडली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरुन अक्षय माने याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. डोके, पाठ, हात, पायावर दांडके मारण्यात आले. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने अक्षय याचा मृत्यू झाला. हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी शोध घेऊन तिघां संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.