सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्रात दमदार पावसाने सुरुवात केल्याने राज्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
निरा खोऱ्यातील निरा-देवघर, भाटघर, वीर व गुंजवनी ह्या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वीर धरण ८७ टक्के भरल्यामुळे निरा उजव्या व निरा डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आले असून वीर धरणामधून निरा नदीत आज सकाळी सहा वाजता ९ हजार ६९६ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.
निरा धरण साखळीतील निरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवनी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. निरा देवघर धरणक्षेत्रात आजपर्यंत एकूण ९५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात ५२.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.