राज्य शासनाच्या नियमानुसार नीरा गावचा आठवडे बाजार भरला
बाजातळावर सोशल डिस्टंसींगचे तंतोतंत पालन.
पुरंदर : प्रतिनिधी
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अनलॉक वन करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने आठवडे बाजार सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठा नीरा येथील आठवडे बाजार आज (बुधवारी) भरवण्यात आला. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्यावतीने सुरक्षीत अंतर, मास्क वापरणे, व्यावसायिकांनी सतत हात सॉनिटायझरने स्वच्छ करणे, गर्दी टाळणे असे आवाहन केल्यानंतर शेतकऱ्यांनी व खरेदीदारांनी याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
कोरोना कोव्हिड१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील खेडेगावातील आठवडे बंद केले होते. अनलॉक वन नंतर आठवडे बाजार सुरू करण्यात आले. बुधवारी आठवडे बाजार भरण्यापूर्वी नीरा ग्रामपंचायतीच्या वतीने संरक्षणात्मक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. आजचा बाजार हा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता.बाजतळावर जंतूनाशक औषधांची फवारणी करुन बाजारतळाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच बाजारात येणाऱ्या ग्राहकांना हात धुण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. कोरोनाच्या संसरर्गाची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांनी बाजारात जाण्याचे टाळले होते. पर गावातील लोक खरेदीसाठी आले होते. लोक तुरळकच असल्याने गर्दि जाणवली नाही. तसेच बाजारतळ प्रशस्थ व सुसज्ज असल्याने काही त्रुटी आज तरी जाणवलेल्या नाहीत. बाजार ठेकेदाराने आज सौम्य भाषेत बाजारकर वसुल केल्याने व्यापा-यांनी समाधान व्यक्त केले. सकाळी बाजार सुरू झाल्यावर लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मनोज ढेरे, उपसरपंच विजय भोसले, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, सदस्य अनिल चव्हाण, कर्मचारी गणिभाई सय्यद, सचिन ठोंबरे, आनंद ओगले, अविनाश माने, अजय काकडे यांनी लोकांना हात जोडून विनंती करत नियम समजून सांगितले.
यावेळी ग्रामसेवक मनोज ढेरे म्हणाले की, तब्बल तीन महिन्यांनंतर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. आजच्या या बाजारामध्ये परिसरातील शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी भाजीपाला व जीवनाश्यक वस्तू विक्रीस आणल्या होत्या. या बाजारासाठी नियमीत येणाऱ्या व्यापाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना केल्याशिवाय बाजारात येण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे व्यापारी, शेतकरी व ग्राहकांनी सावधानता बाळगली होती. ग्रामपंचायत प्रशासनाने सदस्यांसह कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सकाळी बाजारात लोकांना आव्हान केले. सुरक्षित अंतर ठेवा, स्वत: जवळ सॉनिटायझर ठेवा ते सतत हातावर लावा, संपूर्ण दिवसभर तोंडावर मास्क लावून काम करा, भाजीपाल्याला कमीत कमी लोकांनी हाताळावा असे प्रत्येक बाजाकरूला समजवून सांगितले. बाजारा पुर्वी व नंतर सर्व परिसर स्वच्छ करून ट्रॅक्टरच्या सहायाने निर्जंतुकीकरण करण्यात येईल याची खबरदारी घेण्यात आली आहे. पुढिल बाजारा दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर एक सॉनिटायझरचा ट्युनेल उभारण्याचा मानस ग्रामपंचायतीने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS