बाजरीच्या बियांणात शेतकऱ्यांची फसवणूक : मोरगाव परिसरातील प्रकार
मोरगांव : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात खरीपातील बाजरी दुबार पेरणीनंतरही बाजरी उगवली नाही .यामुळे शेतकऱ्यांना आता कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे . पवारवाडी येथील जमीनीमध्ये ओल असूनही बियाणे उगवले नसल्याने बोगस बियाणे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत .
तालुक्याच्या मोरगाव , मासाळवाडी, लोणी भापकर ,जोगवडी, तरडोली या परिसरामध्ये दोन-तीन पावसानंतर जमीन वापश्यावर आल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केली. या पेरणीनंतर बाजरीच न उगवल्याने दुबार पेरणी केली असल्याचे शेतकरी बाबासो सोमाजी पवार यांनी सांगितले. पहील्यांदा २०४ न उगवल्याने दुसऱ्यावेळेस ७७७८ या सुधारीत वाणाची पेरणी केली . मात्र हे बाजरी वाण सुद्धा न उगवल्याचे त्यांनी सांगितले .
यामुळे सुमारे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च वाया गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली .गेल्या पंधरा वर्षांमध्ये पहिल्यांदाच असा प्रसंग घडला असल्याचे पवार यांनी बोलताना सांगितले. यामुळे तिसऱ्यांदा पेरणी करून पुन्हा खर्च वाया न घालवता खरीपातील ईतर पीक घेण्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी घेतला आहे. अशा अनेक शेतकऱ्यांच्या याच व्यथा असल्याने संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे
COMMENTS