महावितरणचा भोंगळ कारभार : वीज चोरीची लेखी तक्रार दिली तरी कारवाई नाही
पुरंदर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भोंगळ्या कारभाराच्या वेगवेगळ्या घटना सतत घडत असतात. तशीच घटना आज उघडकीस आली आहे. मागील दहा वर्षापासून एक महाभाग थेट खांबावरील तारांवर आकडे टाकून घरगुती व बोरवेलला लाईट कनेक्शन वीना मिटर घेत आहे. यासंबंधीत तक्रार एका सजग नागरिकांनी केली असता त्याला हेलपाटावर हेलपाटे मारावे लागत आहेत. तरीही वीज वितरण कंपनी कायदेशीर प्रक्रिया करताना दिसत नाही. त्यामुळे या वीज चोरी करणारे व वीज वितरण करणारे कर्मचारी यांच्यामध्ये काही अर्थपूर्ण साटेलोटे तर नाही ना अशी शंका सजग नागरिक विचारू लागले आहेत.
नीरा नजिकच्या कोळेवस्ती येथील एका घराला अवैध पद्धतीने वीज कनेक्शन घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोपट सतीश धायगुडे राहणार नीरा यांनी महावितरणच्या नीरा येथील उप अभियंता कार्यालयात ३० जून रोजी व बारामतीच्या अधीक्षक अभियंत्यांना १ जुलै रोजी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यानंतर अद्यापही त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे निदर्शनास येत आहे.
नीरा नजीक कोळीवस्ती येथील जिल्हा परिषद शाळे समोरील रामचंद्र कृष्णा लकडे यांच्या घरामध्ये दिवस-रात्र वीज चोरी होत असून महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत व राहत्या घराच्या पाठीमागे मागील बाजूस यांची शेत जमीन असून शेतीमध्ये बोअरवेल असून पाणी उपसा करण्यासाठी राजरोसपणे वीज चोरी करीत आहेत. सदरची स्थिती महावितरण कर्मचारी यांस माहिती असून संगनमताने वीज चोरी होत आहे. जे शेतकरी नियमित वीज बिल भरणा करतात अधिकृतरीत्या विजेचा वापर करतात त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे.
राजरोस पुणे असे वीज चोरीचे प्रकार होत असतील तर महावितरण प्रशासन कुठे कमी पडते की चोरी करणारे व महावितरण कर्मचारी यांची हितसंबंध आहेत. याची चौकशी होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करावी लागेल. आपल्या स्तरावर वीज चोरी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती सतीश धायगुडे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या येथील उप अभियंता यांना केली आहे. तसेच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत यासंबंधीची माहितीही त्यांनी ३० जून रोजी मागितली आहे.
मात्र अद्याप त्यांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच संबंधित घरांमध्ये आजही वीज चोरी सुरूच आहे या संबंधित महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी असलेल्या अधीक्षक अभियंता बारामती यांनाही धायगुडे यांनी पत्रव्यवहार केला असून अद्यापही कोणतीच कारवाई होत नसल्याने यांनी नाराजी व्यक्त करत पुढील काळात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
COMMENTS