मोरगाव’ येथील मयूरेश्वराची भाद्रपदी यात्रा रद्द
मोरगाव : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी ‘मोरगाव’ चे मयूरेश्वराची भाद्रपदी यात्रा रद्द करण्यात आलीय. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी या काळात लाखो गणेश भक्त येथे येतात. या कालावधीत येणाऱ्या भाविकांना मुख्य मूर्तीच्या गाभाऱ्यात जलस्नान घालण्याची संधी प्राप्त होते. यावर्षी मात्र; हा कुठलाच कार्यक्रम होणार नसल्याचे चिंचवड देवस्थान ट्रस्ट चे विस्वत विनोद पवार यांनी दिली.
अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट मोरगावचे मयुरेश्वर दर्शनाने होते. भाद्रपद आणि माघ महिन्यात येथे श्रींची मोठी यात्रा भरते. संपूर्ण राज्यासह देशातून लाखो गणेशभक्त यासाठी मोरगाव ला येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलाय.अशी माहिती सरपंच निलेश केदारी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. मार्चपासून तब्बल सहा महिने हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. या संपूर्ण कालावधीत धार्मिक नित्यविधी साठी जाणाऱ्या पुजारन शिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही.
गेली सातशे वर्षांहून अधिक यात्रोत्सवाची परंपरा आहे. मोरगाव येथे घरगुती अथवा सार्वजनिक मंडळ गणेश मूर्तींची स्थापना करत नाहीत. मात्र येथील मयुरेश्वराची यात्रा हाच प्रमुख उत्सव मानला जातो. येथील धार्मिक पूर्व परंपरेनुसार निवडक पूजा विधि करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना मूर्ती स्नान किंवा श्रीं’चे दर्शन करता येणार नाही.
COMMENTS