सोमेश्वर कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष धुमाळ यांना तात्काळ सेवानिवृत्त करावे, अन्यथा कृती समितीच्या वतीने मोर्चा व उपोषण करण्यात येईल : सतिश काकडे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे (O/S) एस.पी धुमाळ हे दि. ३१/८/२०२० रोजी सेवानिवृत्त होत आहेत. परंतु कारखान्याने अद्यापपर्यंत सदर जागा भरणे संदर्भात कोणत्याही प्रकारची जाहिरात दिलेली नाही या वरून असे निदर्शनास येते की कारखन्याचे चेअरमन हे वैयक्तिक हित संबंध पाहुन धुमाळ यांना मुदतवाढ देण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीशिर माहिती मिळाली आहे.
शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिलेल्या प्रशिदीपत्रकात म्हनटले आहे की, त्या अनुशंगाने मी कारखान्याचे कार्यकारी संचालक व साखर आयुक्त कार्यालयास एस.पी धुमाळ यांना दि.३१/८/२०२ रोजी सेवामुक्त करण्यात यावे यासाठी दि.८/७/२०२० व १०/८/२०२० रोजी लेखी पत्र व्यवहार केलेला आहे. (सोबत पत्र जोडतआहे)
मध्यंतरी कारखान्याचे फायनान्स मॅनेजर कदम यांना मुदतवाढ देण्यासंबंधी संचाल मंडळात मतभेद झाले होते त्यावर साखर आयुक्तालयाच्या निर्देशानुसार मुदतवाढ देणे नियमबाहय असल्यामुळे कदम यांना कार्यकारी संचालक यांनी मुदतवाढ दिली नाही हे कायद्याप्रमाणे होते. (सोबत साखर आयुक्तालायाचे निर्देश
जोडत आहे.) धुमाळ यांच्या बाबतीत सांगायचे तर एस.पी धुमाळ यांनी नियमबाह्य कोणतीही मंजुरी नसताना डिसेंबर २०१३ ते १२ जुलै २०१५ या कालावधीमध्ये कारखान्याचे तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळयांना हाताशी धरून कार्यकारी संचालक पद उपभोगले होते. दरम्यानच्या काळात श्री धुमाळ यांनी कारखान्याचेअधिकारी, कर्मचारी व सभासद यांना वाईट वागणुक देत होते तसेच आरेरावीही करीत होते व कृती समितीनेकेलेल्या पत्रव्यवहारावर कधीही उत्तरे देत नव्हते. अशा सर्व तकारी कृती समितीकडे येत होत्या. तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळाकडुन धुमाळ याने स्वतःची तोंडी कार्यकारी संचालक म्हणुन नेमणुक करून घेतली परंतु त्यांना संचालक मंडळाने लेखी परवानगी दिली नव्हती. यावर मी साखर आयुक्त कार्यालयात तकार दाखल केली होती. त्यावर मा साखर आयुक्त यांनी दि.१७ जुलै २०१४ रोजी एस.पी धुमाळ यांचे काम कायदेशिर नसल्याने त्यांना तात्काळ कमी करून पॅनलवरील कार्यकारी संचालक घेणे बाबतचे आदेश कारखाना प्रशासनाला दिले होते. (सोबत आदेश जोडत आहे)
तरी ही एस.पी धुमाळ यांनी तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळ यांच्या संगणमताने मा.साखर
आयुक्त सो. यांचा आदेश झुगारून सुमारे १ वर्ष अनाधिकृतपणे काम केले होते की जी अत्यंत गंभीर बाब
आहे. धुमाळ यांना मुदतवाढ व अतिरिक्त घेतलेल्या पगाराबाबत मी साखर आयुक्त कार्यालायात दि २६/०७/२०२० व दि.१०/०८/२०२० रोजी लेखी तकार दाखल केली होती (सोबत तकार अर्जप्रत्र जोडत
आहे) त्याची दखल साखर
आयुक्तालयाने घेवुन कारखान्याला दि. २९/७/२०२० रोजी लेखी खुलासा मागीतला होता. (सोबत साखर आयुक्तालयाचा आदेश जोडत आहे) यावर कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांनी दि १०/८/२०२० रोजी साखर आयुक्तांना खुलासा सादर केला (सोबत खुलासा पत्र जोडत आहे)
वास्तविक या खुलाशा पत्रामध्ये सत्य परिस्थिती कथन करणे गरजेचे असताना चेअरमन कार्यकारी संचालक यांनी संगनमत करून धुमाळ यांच्या बाजुने त्यांना मुदतवाढ देण्याच्या हेतुन खालील प्रकारे खुलासा सादर केला. संचालक मंडळ निवडणुक असलेने कार्यकारी संचालक पद भरणे शक्य झाले नाही, धुमाळ यांचेमुळे उत्कृष्ट तांत्रीक पुरस्कार मिळाला, धुमाळ यांना कार्यकारी संचालक यांना लागु असणारी वर्ग १ ग्रेड प्रमाणे वेतन दिले जात नसल्याने त्यांची पगार वसुली करणे योग्य होणार नाही, स्टॉफिंग पॅर्टन नुसार ए ग्रेड पगार वाढ धुमाळ यांना दिली, धुमाळ यांनी कारखान्याची २० वर्ष सेवा केली आहे त्यामुळे कार्यकारी संचालक यांनी धुमाळ यांची वसुली करणे योग्य होणार नाही असा कारखान्याने खुलासा केला आहे, त्यामुळे या खुलाशाचा सहानुभुती पुर्वक विचार करण्याची विनंती कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांनी साखर आयुक्त कार्यालयाला केली आहे.वास्तविक कारखान्याचे कार्यकारी संचालक हे साखर आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणुन पदावर आले आहेत का कारखान्याचे नुकसान करण्यासाठी? तरी कार्यकारी सचालक यांनी चेअरमन व धुमाळ यांचीमर्जी राखण्यासाठी काम करू नये. मुळात धुमाळ यांची शिफारस करण्याचा कार्यकारी संचालक यांना अधिकारआहे का? तसेच साखर आयुक्त कार्यालयाने माझ्या पत्राचा कार्यकारी संचालक यांना खुलासा मागितलेला होताधुमाळ यांची शिफारस नाही. मुळात धुमाळ यांनी दिड ते दोन वर्ष कार्यकारी संचालक म्हणुन जे कामकाज
केले आहे तेच बेकायदेशिर होते. कारण एस.पी धुमाळ हे संचालक मंडळाचा ठराव व साखर आयुक्तांची कोणतीही परवानगी नसताना कार्यकारी संचालक म्हणुन काम करीत होते. त्या दरम्यान धुमाळ यांनी स्व:ताचापगार वाढवला याबाबत संचालक मंडळाने कोणताही ठराव देखील केला नव्हता. जरी केला असल्यास साखरआयुक्त यांची परवानगी नसल्याने तो ठराव बेकायदेशिरच होतो. त्यामुळे साखर आयुक्त यांनी धुमाळ यांनातात्काळ कमी करून पॅनेल वरील नवीन कार्यकारी संचालक घ्यावा असे निर्देश दिले होते हे कारखानाप्रशासनाने विसरू नये. धुमाळ यांनी पगाराचा लाखो रूपये फरक घेतला तो ही बेकायदेशिरच आहे. तसेचनंतर नवीन कार्यकारी संचालक आल्यानंतर श्री धुमाळ यांचा पगार कमी करणे गरजेचे होते. परंतु त्यांनीस्वतःचा पगार कमी न करता लाखो रूपये पगार घेतला आहे.
कारखान्याने आत्ता पर्यंत किती कर्मचाऱ्यांना स्टॉकिंग पॅर्टन नुसार सुपरवायजरी ए ग्रेड पगार वाढ दिली? या धुमाळ ने कारखान्याचे काय भले केले? २० वर्षात कारखान्याला किती योगदान दिले? त्याच प्रमाणे कार्यकारी संचालक यांनी मा.साखर आयुक्त कार्यालयात जो खुलासा सादर केला आहे त्यामध्ये तत्कालीनकार्यकारी संचालक यांच्या नेमणुकीचा ठराव केला आहे का? किती तारखेस केला आहे व त्या खुलाशामध्ये तेका नमुद केले नाही? तसेच कार्यकारी संचालक यांनी साखर आयुक्त यांना दिलेल्या पत्रामध्ये खुलासा करण्याऐवजी धुमाळ यांचीच शिफारस केली आहे. त्यामुळे कृती समितीस कार्यकारी संचालक यांच्या भुमिके बद्दल संशय निर्माण झालेला आहे.
कार्यकारी संचालक यांना मा. साखर आयुक्त सो यांनी नियुक्त केलेअसल्याने ते सरकारी नोकर
आहेत त्यामुळे मा. साखर आयुक्त सो यांनी दिलेले निर्देश व त्याचीअंमलबजावणी करणे त्यांचे कर्तव्यआहे. कोणाची शिफारस करण्यासाठी नव्हे याचे भान ठेवावे का चेअरमन व धुमाळ यांची सहानभुती मिळविण्या साठी कार्यकारी संचालक हे करीत आहेत. कार्यकारी. संचालकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडताआपले कर्तव्य पार पाडावे. आपल्या कारखान्याच्या सभासदांची अनेक मुले उच्चशिक्षीत आहेत. तसेचबेरोजगारीची समस्या देखील असल्याने आपल्या कारखान्याच्या सभासदांच्या योग्यता प्राप्त मुलांना सदर पदावरकाम करण्याची संधी द्यावी. तसेच मा.साखर आयुक्त सो यांनी बी.एन कदम सो यांच्या संदर्भातकारखाना प्रशासनास दिलेले निर्देश एस.पी धुमाळ यांनाही लागु करणेबंधनकारक आहे. (सोबत दि.१८/६/२०२० रोजीचे स्टॉफिंग पॅर्टन संदर्भात प्रादेशिक सह संचालक यांचे आदेश पत्र.) तरी धुमाळ यांनाकोणतीही मुदतवाढ न देता त्यांनी घेतलेला जादा पगार व्याजासह वसुल करून एस.पी. धुमाळ यांना दि३१/८/२०२० रोजी सेवेतुन कार्यमुक्त करावे.
तरी कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कृती समितीने पदाधिकाऱ्यांना बोलावुन कारखान्यास निवेदन
देण्यात आले आहे. कारखान्याने जर दिलेल्या निवेदनावर तात्काळ योग्य तो निर्णय न घेतल्यास कार्यकारी संचालक, चेअरमन व संचालक मंडळाच्या विरोधात हायकोर्टात दाद मागावी लागेल व होणारा सर्व खर्च।वैयक्तिकरित्या आपणा सर्वाकडुन वसुल केला जाईल व आंदोलनाची तीव्रता वाढवुन वेळप्रसंगीसभासदांच्या
वतीने मोर्चा कारखाना कार्यस्थळावर उपोषणास बसण्यात येईल व यादरम्यान काही अनुचीत प्रकार घडल्यासयाची सर्वस्वी जबाबदारी कार्यकारी संचालक, चेअरमन व संचालक मंडळावर राहिल याची नोंद घ्यावी असे सतीश काकडे यांनी सांगितले आहे.
सोमेश्वर कारखान्यातील खरे व्हिलन सुभाष धुमाळ
धुमाळ यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कर्मचारी, अधिकारी यांना वाईट वागणुक दिलेली आहे. त्याचप्रमाणे सभासदांनाही अरेरावीची उत्तरे देत होते. त्यामुळे सभासदांच्या व कामगारांच्या मनातील खरे व्हिलन हे धुमाळ हेच आहेत. त्यामुळे त्यांना मुदतवाढ न मिळणे बाबत पंचकोशितील तमाम
सभासदांचे मत आहे.
COMMENTS