पुरंदर विमानतळास बारामतीकरांचा विरोध : तहसीलदादारांना निवेदन

Admin
सुपे : दीपक जाधव
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------

 बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्याने नव्याने होणाऱ्या नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भातील निवेदन तालुक्याचे प्रांताधिकारी तसेच तहसिलदार यांना देण्यात आले आहे. 
        यापुर्वी पुरंधरमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळाची नियोजित जागा बदलुन दुसऱ्या ठिकाणी करण्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या. त्यानुसार बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी आणि आंबी खुर्द आदी गावांचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र हा प्रयत्न बारामती तालुक्यातील गावे हाणून पाडतील असा इशारा या परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. 
      मात्र नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी या गावातील जमिनी घेण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही सर्व्हे झालेला नाही. तसेच प्रशासनाकडून आम्हाला तशी कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र वर्तमानपत्रामध्ये या भागातील जमिनी जिरायती असल्याने याठिकाणी विमानतळ होण्यास हरकत नसल्याचे आले होते. मात्र ही माहिती पुर्णतः खोटी आहे. याठिकाणी मागिल सहा वर्षापासून जनाई उपसा योजनेचे पाणी येत असल्याने येथील बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. 
     त्यामुळे गेली पाच ते सहा वर्षांपासून या भागात नियमित येत आहे. तसेच चांदगुडेवाडी गावाच्या दक्षिण बाजूने कऱ्हा नदी वाहत आहे. त्यामुळे चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावातील संपूर्ण क्षेत्र हे बागायत स्वरूपाचे झाले आहे. या परिसरात ऊस, कांदा, गहू, टोमॅटो इत्यादी नगदी स्वरूपाची पिके घेण्यात येत आहेत. तसेच डाळिंब, पेरू, सिताफळ इत्यादी फळबागा देखील मोठया प्रमाणात घेतल्या जात आहेत. तसेच या गावामध्ये २५ ते ३० शेततळी देखील शेतकऱ्यांनी तयार केलेली आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी माळरान जमिनी सुद्धा मोठ्या कष्टाने बागायती केलेल्या आहेत.
       या गावातील बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. तसेच चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावामध्ये शेती बरोबर पशुपालन व पोल्ट्री व्यवसाय देखील मोठया प्रमाणात असून त्यामधून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळत आहे. अशी माहिती प्रांताधिकारी व तहसिलदारांना ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही गावांनी एकत्र येवुन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळास तीव्र विरोध दर्शविला आहे. 
                .........................................................

To Top