तिकिटासाठी कोणीही मुंबईला येऊ नये : उपमुख्यमंत्री अजित पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा करण्यात येईल. यासाठी कोणीही मुबंईला येवू नये. तालुक्यातील अन्य संस्थावर इच्छुकांना संधी देण्यात येईल. एकाच गावात दोन गट असल्याने कोणीही राग डोक्यात घेऊ नये. तरुण म्हणतात माझी पहीलीच वेळ तर वयस्कर म्हणतात माझी शेवटची वेळ आहे त्यामुळे उमेदवार निवडणे अवघड आहे. प्रत्येकाचे संचालक होण्याचे स्वप्न पूर्ण होणे अवघड आहे. सोमेश्वरच्या निवडणूकीत जुन्या नव्यांचा मेळ घालण्यात येईल.  कोणीही कोणाला पाण्यात बघु नये अशा कानपिचक्याही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इच्छुक उमेदवारांना दिल्या.
                सोमेश्वरनगर ता बारामती येथे सोमेश्वर पॅलेस याठिकाणी सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीबाबत आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, प्रा. दिगंबर दुर्गाडे, माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सभापती निता फरांदे,  विश्वास देवकाते, संग्राम सोरटे, संदीप जगताप, विजय कोलते, शहाजीराव काकडे, राजवर्धन शिंदे, शैलेश रासकर, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की  निवडणूकीत दिलेले उमेदवार निवडणूक आणण्याचे काम सर्वांनी एकदिलाने करावे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक नियोजन करताना अडचण येत आहे. सोमेश्वर शिक्षण संस्थेची प्रगती होत आहे तर त्यार अजून भर टाकायची आहे. तीन्ही तालुक्यात आपलेच आमदार असल्याने उमेदवारी देताना त्यांचेही म्हणणे ऐकून घेणार आहोत. प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने सर्वांनी मतदारांपर्यंत पोहचावे लागणार आहे. प्रचारासाठी सभा घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितल्याने बिनविरोध निवडीची शक्यता मावळली आहे. साखर कारखान्यात चुकीचे काम केले, नियोजन बिघडले तर कारखाने बंद पडतात यासाठी चांगले संचालकमंडळ त्याठिकाणी आवश्यक आहे. पवारांनी सहकारी संस्था बंद पाडल्या असा आरोप होतो तो चुकीचा असून उलट आम्ही अडचणीतील संस्था बाहेर काढल्या आहेत. यावेळी आमदार संजय जगताप, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार अनिल धुमाळ यांनी  मानले.
.....................
आणि 'सोमेश्वर'ने करून दाखवलं-----
सोमेश्वर कारखान्याने मागील पाच वर्षात कर्जमुक्तीसह उपपदार्थाची अधिकची निर्मिती करत राज्यात उच्चांकी दर दिला सध्या विस्तारीकरणाचे पुढचे पाऊल उचचले आहे. त्यामुळे मागील पंचवार्षिक निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले असून सोमेश्वरने करून दाखवल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.   
.................
भाजपने त्यांच्या काळात बारामती सह अन्य तालुक्यातील शेतीचे ५ टीएमसी पाणी बंद केले होते. महाविकास आघाडी सरकार आल्याने येथील शेतीला वेळेत पाणी मिळावे यासाठी निर्णय घेतला अन्यथा शेतीचा धुराळा झाला असता अशी टीका अजित पवार यांनी यावेळी केली.

..................
To Top