परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे : पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी पुरंदर चे आमदार संजय जगताप यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 
       आमदार जगताप यांनी दिलेल्या पत्रात म्हणटले आहे की,  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व विविध मागण्यासाठी एस. टी. कामगार संघटनांनी राज्यभर संप सुरु केलेला आहे. एस. टी. कामगारांच्या मागण्या मंजूर न झाल्याने एस. टी. महामंडळाबाबत कामगारामध्ये आक्रोश व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासुन एस. टी. कामगार हे तुटपुंज्या पगारावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित आलेले आहेत. परंतु सद्याच्या वाढत्या महागाईच्या काळात आर्थिक संकटाला कंटाळून राज्य भरातील ६९ कर्मचाऱ्यांनी आपला जिव गमवला आहे. राज्यातील ग्रामिणभागाचा विकासाची नाळ असलेल्या एस. टी. च्या कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात बदल घडुन आणण्यासाठी त्यांच्या कडुन होत असलेली विलीनीकरणाबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. तरी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे. असे पत्रात नमूद केले आहे.
To Top