सोमेश्वर रिपोर्टर टीम------
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने नुकताच पर्यटनस्थळे बंद बाबतचा आदेश काढला आहे हा आदेश महाबळेश्वरकरांना
अन्यायकारक आहे प्रेक्षणीय स्थळ बंद केलीत तर महाबळेश्वरमध्ये पर्यटक पर्यटनासाठीच येणार नाहीत. त्यामुळे छोट्या-मोठ्या स्थानिक व्यापारी
व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार असून महाबळेश्वर मधील प्रेक्षणीय स्थळे ही ठराविक निर्बंध ठेऊन सुरु ठेवण्यात यावीत अशी मागणी शासनदरबारी करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांनी हॉटेल संघटनेच्यावतीने आयोजित बैठकीत सांगितले यावेळी हॉटेल संघटनेचे पदाधिकारीउपस्थित होते.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहेत तसेच कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबदरदारीचा उपाय म्हणून शासनाने राज्यात सोमवार पासून कडक निर्बंध लागू केले आहेत यामध्ये प्रामुख्याने पर्यटनस्थळे बंद बाबत देखील निर्णय घेतल्याने महाबळेश्वरमधील व्यापारी व्यावसायिक चिंतेत असून येथील कल्पना हॉटेल येथे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांची एक बैठक पार पडली या बैठकीत माजी
नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांनी बोलताना ,महाबळेश्वर पर्यटनस्थळाचा अर्थकारण हे पर्यटकांवर अवलंबून असून गेल्या दोन वर्षांपासून कोरोना
प्रादुर्भावामुळे येथील व्यापारी व्यावसायिक चिंतेत आहेत आताकुठे व्यवसाय सुरु झाला होता मात्र पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने शासनाने नवीन निर्बंध लागू केले आहेत यामध्ये पर्यटनस्थळे बंद करण्याबाबत देखील नमूद करण्यात आले आहे. महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळेच बंद केलीत तर येथे पर्यटनास पर्यटक येणार नाहीत पर्यटकच जर आले नाहीत तर व्यवसायाचं पूर्णपणे ठप्प होईल पर्यटकांवर येथील अर्थकारण व जीवनमान अवलंबून आहे.मात्र जर प्रेक्षणीय स्थळे बंद केली तर महाबळेश्वर मधील टॅक्सी व्यावसायिक,घोडे व्यावसायिक,गाईड,
कॅनव्हर्सर,छोटे मोठे व्यापारी हॉटेल व्यावसायिकांवर आर्थिक संकट व उपासमारीची वेळ येईल याकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असून प्रेक्षणीय स्थळे वेण्णालेक नौकाविहार येथे स्थानिक प्रशासनाने गर्दी होणार नाही अश्या पद्धतीने योग्य प्रकारे नियोजन केल्यास सुरु ठेवता येतील या ठिकाणची परिस्थिती पाहून निर्णय शासनाने व जिल्हाधिकारी यांनी घ्यावा ठरावीक निर्बंधांसह पर्यटनस्थळ सुरु ठेवल्यास स्थानिक व्यापारी व्यावसायिक प्रशासनास सहकार्य करतील याबाबतचा निर्णय शासनाने व जिल्हाधिकारी यांनी घ्यावा असे देखील बावळेकर यांनी यावेळी सांगितले पर्यटनस्थळावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावे यासाठी लवकरच महाबळेश्वरचे एक शिष्ठमंडळ पर्यटन मंत्री ना आदित्य ठाकरे व
पर्यटन राज्यमंत्री ना अदिती तटकरे याना भेटून याबाबत चर्चा करणार असून यातुन मार्ग निघाला नाही तर सर्व व्यापारी-व्यावसायिक हे आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील त्यांनी या बैठकीत दिला हॉटेल संघटनेचे सूर्यकांत जाधव यांनी दोन डोस घेतलेल्या पर्यटकांनाच आम्ही हॉटेल मध्ये प्रवेश देतो मात्र पुन्हा आता ४८ तास आधीच कोरोना चाचणी निगेटिव्ह बाबतचा नवीन नियम हा अन्यायकारक व जाचक असल्याचे सांगून शासनाने या निर्णयाचा फेर विचार करावा असे सांगितले तर महाबळेश्वर तालुक्यात प्रवेश करतावेळीच दोन डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र दाखवूनच येथे प्रवेश देण्यात यावा स्थानिक प्रशासनाने याबाबत उपाययोजना कारवायात असे हॉटेल संघटनेने पत्रकारपरिषदेत सांगितले यावेळी हॉटेल संघटनेचे सूर्यकांत जाधव,शंकर जांभळे,आशिष नायडू,ब्रिजभूषण सिंग,धीरेन नागपाल,रोहन कोमटी,जब्बारभाई,नॅलिनो डिक्रूज
आदी उपस्थित होते या बैठकीत पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील ना शंभूराज देसाईं खा श्रीनिवासपाटील जिल्हाधिकारी शेखर सिंह याना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले.
COMMENTS