सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : धनंजय गोरे
जावली तालुक्याची आर्थिक नाडी असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी. ही खुद्द खा. शरद पवार यांचेसह तालुक्यातील नेते व सर्वसामान्य शेतकरी कारखाना सभासदांची इच्छा असताना .आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर " "प्रतापगडचं " धुरांड पेटण्या अगोदरच निवडणूक लागल्याने , राजकारणाच धुरांडं मात्र पेटलं आहे.
निवडणूक प्रक्रियेमध्ये ६९ उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी आज अखेर ३० उमेदवारांनी माघार घेतल्याने १८ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून यामध्ये जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांच्या कारखाना गटाचे १८ तर , जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांच्या गटाचे १७ , व एक अपक्ष असे उमेदवार निवडणुक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र कारखाना गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
दरम्यान सर्वसाधारण खातेदार कर्जदार ,प्रतिनिधी या गटामधून सुरेश बाबर, राहुल बावकर ,जितेंद्र शिंदे, मालोजीराव शिंदे, यांनी माघार घेतली असून या गटामध्ये प्रशांत नायकुडे ,प्रकाश शिंदे राजेंद्र शिंदे, सौरभ शिंदे , सुनेत्रा शिंदे, हे तीन जागांसाठी पांच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.
व्यक्ति उस उत्पादक सभासद गट क्रमांक खर्शी -सायगांव गटामधून मुकुंदराव जाधव ,शरद निकम ,लक्ष्मण पवार, लक्ष्मण भोसले यांनी आपली उमेदवारी माघार घेतली असून या गटातून भानुदास भोसले ,चंद्रकांत गायकवाड ,शिवाजी गायकवाड ,आनंदा मोहिते ,शांताराम पवार ,अंकुश शिवणकर असे सहा उमेदवार तीन जागांसाठी निवडणूक लढवू लढवत आहे.
व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक तीन हुमगाव या गटातून कृष्णात तरडे, रघुनाथ तरडे ,कुलदीप नलावडे, हनमंत पार्टे, मोहनराव शिंदे यांनी आपली माघार घेतली असून संतोष गोळे, रामदास पार्टे, मधुकर पोपळे ,अजित शेलार, आनंदराव शिंदे ,प्रदीप तरडे असेच सहा उमेदवार तीन जागांसाठी निवडणूक लढवत आहेत.
व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक चार मेढा या गटातून सुरेश पार्टे, राजाराम इंदलकर ,तुकाराम जुनघरे ,नामदेव धनवडे, सूर्याजी विधाते ,नारायण शिंदे यांनी माघार घेतली असून सुभाश दरेकर ,बाळकृष्ण जाधव, आनंदराव जुनघरे, शिवाजीराव मर्ढेकर ,बाळासाहेब निकम असे सहा उमेदवार तीन जागांसाठी निवडणूक लढवीत आहेत.
व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक पाच महाबळेश्वर या गटामधून बापुराव पार्टे, विकास देशमुख हरिभाऊ बिरामणे, यांनी माघार घेतली असून महादेव दुधाने, चंद्रकांत ओंबळे ,गणपत पार्टे, नानासाहेब उर्फ जयवंत सावंत, उत्तम शेडगे ,गंगाराम शेलार, दिलीप वांगडे हे सात उमेदवार तीन जागांसाठी निवडणूक लढवीत आहेत.
अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघांमधून लाला भिसे, जयसिंगराव रोकडे यांनी माघार घेतली असून राजेंद्र कांबळे, बाळकृष्ण निकम हे एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
विमुक्त भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग या गटातून प्रवीण जाधव, राहुल बावकर यांनी माघार घेतली असून कुसुम गोसावी, सुरेश पवार हे दोन्ही एका जागेसाठी उमेदवार निवडणूक लढवीत आहेत .त्याचबरोबर इतर मागास प्रवर्ग राखीव गट या गटातून प्रशांत नायकुडे आणि विजय शेवते हे दोन उमेदवार एका जागेसाठी निवडणूक लढवीत आहेत
संस्था प्रतिनिधी गटामधून विठ्ठल मोरे तर महिला राखीव गटामधून शोभाताई बारटक्के आणि ताराबाई पोफळी या कारखाना गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत
सदर निवडणुकीसाठी 13 मार्च रोजी मतदान प्रक्रिया होणार असून येत्या दहा-बारा दिवसात प्रतापगडच्या निवडणुकीमुळे राजकारणाचं धुरांडं चांगलच पेटणार आहे. दरम्यान आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी अशी सूचना दिल्यामुळे या प्रक्रियेसाठी तालुक्याचे नेते माजी जलसंपदामंत्री आमदार शशिकांत शिंदे , माजी आमदार सदाशिव (भाऊ )सपकाळ ,जावली पंचायत समितीचे उपसभापती कारखाना गटाचे नेते सौरभ (बाबा) शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत होते अखेर त्यांना या प्रक्रियेमध्ये अपयश आल्याने व जिल्हा परिषदेचे सदस्य दिपक पवार यांनी कारखाना बचाव धोरण पूढे करून आपले १७ उमेदवार उभे केल्याने हि निवडणूक लागली आहे . त्यामुळे प्रतापगडचा राजकीय धोरणे पेटलं. असून या निवडणूकी मुळे तालुक्यात राजकिय रंगत येणार आहे. तर कारखाना गटाला आपली सत्ता अबादीत ठेवण्यासाठी दोन हात करण्याची वेळ आली आहे
COMMENTS