सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
तलजोशी विद्यालयातील राज मांढरे या १० वीच्य विद्यार्थ्यांने ३ लहान मुलांचे कालव्यात बुडत असताना वाचविले प्राण .वाई पोलिस ठाण्यातील सपोनि रविंद्र तेलतुमडे व पोलिस कर्मचारी यांच्या मार्फत आपल्या प्राणाची बाजी लावणार्या या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .वाई शहरातील नागरिकांनी देखील या धाडसी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .
वाई पोलिस ठाण्याचे सपोनि रविंद्र तेलतुमडे यांनी दिलेली माहिती अशी की राज सुनील मांढरे वय १६ राहणार गाडवेवाडी ता.वाई हा वाई शहरातील तलजोशी विद्यालयात इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत आहे तो आज दि.१०
रोजी यशवंत नगर परिसरात राहणार्या आपल्या
मित्राकडे सायंकाळी ५|३० वाजण्याच्या सुमारास जात असताना त्या वेळी लगत असणार्या धोम डाव्या कालव्यात मंगेश साळी वय ८ वर्ष सुभान साळी वय ९ वर्ष आणी यश पवार वय १२ वर्ष तिघेही राहणार यशवंत नगर ता.वाई हे बुडत असताना कालव्यातून वाचवा वाचवा असा आवाज राज मांढरे याला आल्यामुळे तो क्षणभर थांबला आणी कालव्याकडे पाहिले असता त्याला वरील तिघेजण कालव्यातून बुडत पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत जाताना दिसले त्या वेळी राज या विद्यार्थ्यांने क्षणाचाही विलंब न लावता अंगावरच्या कपड्यासह कालव्यात उडी टाकून
त्या बुडत असलेल्या तिनही लहानग्यांना बाहेर
काढुन त्यांचे प्राण वाचविले .त्याच्या या धाडसी कृत्याचे वाई पोलिस ठाण्याचे सपोनि रविंद्र तेलतुमडे आणी सर्व पोलिस कर्मचार्यांनी सत्कार करुन कौतुक केले आहे .राज मांढरे याच्यावर वाई शहरासह तालुक्यातुन कौतुकांचा वर्षाव होत आहे .
COMMENTS