सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
बलकवडी धरणातून ३०० क्वुसेस पाणी धोम धरणात सोडल्याने बलकवडी धरणा खालील गावातील नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन नायब तहसीलदार वैशाली घोरपडे यांनी केले आहे.
धोम बलकवडी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने धरणात पाणी आवक वाढल्याने जलाशय परिचालन आराखड्यानुसार धरणातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने आज रात्री 10.00 वाजता धरणातून 300 क्युसेक्स ने पाणी विसर्ग विद्युत गृहा मार्फत धोम धरणात सोडण्यात येईल व पाण्याची आवक पाहुन आवश्यकते प्रमाणे विसर्ग वाढविण्यात येईल . तरी बलकवडी धरणा खालील गावे बलकवडी, नांदगणे, परतवडी, कोंढवली बु/खु, वयगाव, दह्याट, बोरगाव बु/खु यांनी नदी पात्रात जाऊ नये असे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.