वाई बिग ब्रेकिंग ! दौलतराव पिसाळ ! मूल होत नसल्याच्या नैराश्यातून गळफास घेत दांपत्याची आत्महत्या

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
 मूल होत नसल्याच्या नैराश्यातून कणूर (ता. वाई) येथील राजपुरे दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे कणुर गावासह बावधण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
         याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, कणूर (ता. वाई) येथील तानाजी लक्ष्मण राजपुरे (वय ४०) व सौ पूजा तानाजी राजपुरे (वय ३५) यांचा विवाह तेरा वर्षांपूर्वी झाला होता. तेरा वर्षांपासून त्यांना मूलबाळ होत नव्हते. यासाठी दोघेही औषधोपचार घेत होते. मात्र सततची पदरी पडणाऱ्या निराशेला कंटाळून त्यांनी दुपारी १२ च्या सुमारास राहत्या घरामध्ये पत्र्याखालील लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर पोलिस पाटिल सुरज जठार यांनी पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलिस हवालदार के. एस. मुजावर व के. ए. आवळे करित आहेत.
To Top