सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
राज्य सरकारने विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.
दि. १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार आहे. त्या संदर्भात आता संगणक प्रणालीत बदल करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
त्याच भूमी अभिलेख विभागानेही ही अर्जदारासह सुविधा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भूमी अभिलेख विभागातील ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य संचालक सरिता नरके म्हणाल्या, दि. १ मेनंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचे संपूर्ण रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षांचा कालावधी जातो. मात्र, सध्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी
आईच्या नावाचा नवा रकाना तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत संगणक प्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत. त्या प्रक्रियेला येत्या तीन ते सहा के महिन्यांचा कालावधी लागणार आहे. येत्या ६ महिन्यांत जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या वि नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. त्या व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा. लागणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावासोबत आईचे नाव लावले जाईल. त्या संदर्भातील पुरावे तलाठ्यामार्फत शहानिशा केल्यानंतरच नोंद होणार आहे.' दरम्यान, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्याच्या पद्धतीनुसार, विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव पुढे पतीचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे.