पोल्ट्रीमूळे माशांच्या उपद्रवला कंटाळले नागरिक; उपोषणाचा इशारा
कर्नलवाडीच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या निर्णयाला कचऱ्याची टोपली
नीरा दि:२०
कर्नलवाडी (ता.पुरंदर) येथील पोल्ट्री मुळे वायु प्रदुषण व माशांचा प्रदुर्भाव वाढल्याने पोल्ट्री बंद करावी असा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला. हा निर्णय पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, तहसीलदार रुपाली सरनोबत, आमदार संजय जगताप यांनी कळवूनही प्रशासनाने काहीही कार्यवाही केली नाही त्यामुळे व्यथित होऊन येथील सरपंच सुधीर निगडे यांनी आता पोल्ट्रीच्या पुढेच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे खुशाल तक्रार करा; आमचे मालक महाराष्ट्र शासनाचे उपायुक्त अधिकारी असल्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही अशी बढेजाव संबंधित पोल्ट्री व्यावसायिक मारत असल्याने वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्नलवाडी गावच्या पश्र्चिमेला असलेल्या झिरपवस्ती येथिल भर लोकवस्तीत गितांगली ब्रिडर्स प्रा.लि. या नावाने मोठी पोल्ट्री आहे. परगावतील शंभर कामगार या ठिकाणी कामासाठी येतात. या पोल्ट्री मध्ये सतरा युनीट आहेत. एका युनिट मध्ये ७ हजार पक्षी असुन मोठ्या संख्येने अंडी उत्पादीत करण्यात येते. कोंबडीची पिल्ले तयार करण्यासाठी अंडी (पॅरंट्स बर्ड्स) येथे तयार केली जातात. अंडी हाताळताना काही प्रमाणात ती फुटतात त्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने केली जात नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात माशांची वाढ होते. पोल्ट्रीतील टाकाऊ वस्तुंचीही विल्हेवाट करण्यासाठी एक बॉयलर केला आहे. तो बॉयलर कंपनी पासून काही अंतरावर शेतात आहे. बॉयलर मध्ये टाकाऊ वस्तू जाळल्या जातात त्यामुळे प्रचंड उग्र वास येतो. सकाळ संध्याकाळ वरा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना हा उग्र वास झिरपवस्तीत येतो व प्रचंड वायु प्रदुषण होते. गेली दोन वर्षांपासून लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे उपसरपंच धनराज कोंडे म्हटले.
सकाळ संध्याकाळ गोपालक गायीचे दुध काढताना माश्या त्रास देतात गायींची हलचाल होते गाय लाथ मारल्याने दुधाची भांडी पडतात, दुध वाया जाते तर कित्येक वेळा माशा दुधात पडतात. जेवताना ही अन्नात माशा पडतात अशी तक्रार स्थानिक गोपालक संपत करगळ यांनी केली आहे. पोल्ट्रीचि स्वच्छता करणे वेळी कोंबड्यांची विष्ठा व पाणी एकत्रित होते ही सर्व घाण मोकळ्या जागेत मुरवली जाते. त्यामुळे शेजारील विहिरींचे प्रदुषीत होण्याची शक्यता आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर मशा तयार होतात. बोयलर मधुन निघणा-या धुरचा प्रचंड दुर्गंध येतो. त्यामुळे शेजारील शेतात मजुर कामास येत नाहीत. मशांनमुळे शेती धोक्यात आली असल्याचे दादा वाघापुरे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी प्रदूषण नियंत्रत करण्यासाठी व माशांचा होणारा त्रास या बाबत पत्र दिल्यावर मग्रुरी पोल्ट्री चालक गांभिर्याने घेत नाहीत. ग्रामस्थ विचारणा करण्यासाठी गेले असता मॅनेजर उडवाउडवीची उत्तरे देतात. आमचे मालक ... शासनाचे अधिकारी आहेत. त्यांना काही फरक पडत नाही. कोणीही कितीही तक्रार करा. कंपनी कडून तकलादु औषध फवारणी केली जाते व सह्य घेतल्य जातात. वास्तविक कोणतेही प्रदुषण नाही अथवा सर्व व्यवस्थीत असल्याचे लाहीलेल्या कागदावर सही लोकांकडून घेतली जात असल्याचे बाप्पु महानवर यांनी सांगितले.
_________________________________________
सुधिर निगडे :- सरपंच कर्नलवाडी.
'पोल्ट्री व्यावसायिकाने योग्य पद्धतीने उत्पादन करावे.स्थनिकांना वायु प्रदुषण व माशांचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्नात माशा पडणे ही गंभार बाब आहे. ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला आहे. प्राशासन गांभीर्याने घेत नसेल तर लोकांच्या आरोग्यासाठी पुढिल सात दिवसांनी कंपनीच्या गेटवर उपोषण करण्यात येईल.'
COMMENTS