सोमेश्वरनगर परिसरात गारपिटीने शेकडो एकर तरकारीला फटका
सोमेश्वरनगर दि २०
काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपल्याने शेकडो एकरांवरील तरकारीला फटका बसला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
काल सायंकाळी सोमेश्वरनगर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीने सोमेश्वरनगर परिसरातील निंबुत, वाघळवाडी, मळशी, वाणेवाडी, मुरूम या गावाने गारपिटीने झोडपून काढले, यामध्ये शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून टोमॅटो, कारली, कोबी, कोथिंबीर, कलिंगड, मिर्ची ही सगळी पिके जमीनदोस्त झाली आहेत, तर गारांनी ऊस पिकाचे देखील मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच अनेक झाले उन्मळून रस्ते बंद झाले आहेत, तर अनेक घरांवरील व गोट्यांवरील पत्रे उडून जनावरे जखमी झाली आहेत. तसेच मळशी या ठिकाणी १० पेक्षा अधिक विद्युत खांब पडल्याने अजून दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे.
COMMENTS