आनंदी थाळीत जिलेबी, गोरगरीबांना आश्चर्याचा धक्का. केली कृतज्ञता व्यक्त
नीरा : प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना दोन घास गरमगरम जेवण पुरंदरचा ग्रामीण संस्थेने दररोज आनंदी थाळी सुरू केली आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त व ॲड.अक्षय रमेश भालेराव यांच्या वाढदिवसा निमित्त नीरा येथे या आनंदी थाळी मध्ये जिलेबी वाटप करण्यात आली. थाळीत आज अचानक गोड जिलेबी बघुन गोरगरीबांना आश्चर्याचा धक्का बसला. नीरेतील बाराशे कुटुंबातील सदस्यांनी जिलेबी खाताना ग्रामीण संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पुरंदरचे आमदार संजय जगताप व ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धीनी जगताप यांच्या माध्यमातून पुरंदर - हवेली तालुक्यातील मोठ्या शहरात सुमारे बारा हजारांहून अधिक लोकांना दोन वेळचे गरमगरम जेवण वाटप केले जात आहे. पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे तसेच काही सामाजिक कार्यकर्ते उत्स्फुर्त पणे आनंदी थाळीचे वाटप करत आहेत. नीरा येथील ॲड. अक्षय रमेश भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त शुक्रवारी आनंदी थाळीत जिलेबी वाटप करण्यात आली. पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध विधीतज्ञ ॲड.विजय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली नीरेतील सहा प्रभागातील सार्वजनिक ठिकाणी आनंदी थाळीत जिलेबी वाटप करण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना महाराष्ट्र दिनानिमित्त व ॲड. भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त ताटात जालेबी भेटल्याने समाधान व्यक्त केले. नीरेतील सुमारे बाराशे कुटुंबातील सदस्य आनंदी थाळीचा स्वाद घेत आहेत. आमदार संजय जगताप व ॲड.विजय भालेराव यांच्या या उपक्रमाचे कौतुक नीरासह पुरंदर तालुक्यात होत आहे. राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे आनंदी थाळीचे जेवण तयार करण्यासाठी प्रसिद्ध केटरर्स अजित माने माफक दरात सेवा देत आहेत. आज ॲड.अक्षय भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, ॲड.विजय भालेराव, पुरंदर तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष अभिषेक भालेराव,नंदू शिंदे, सतिश पवार, आदी उपस्थित होते.
COMMENTS