काळजीवाहु संचालक मंडळ असल्याने धोरणात्मक निर्णय घेऊ नये- सतीश काकडे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक (पंचवार्षिक) मुदत दि.१९/४/२०२० रोजी संपली असुन
राज्य शासनाच्या मेहरबानी मुळे पुढील संचालक मंडळ निवडुन येईपर्यंत चालु संचालक मंडळाला मुदत मिळाली असली तरी ते काळजीवाह संचालक मंडळाने कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये असे मत शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी व्यक्त केले आहे.
#जाहिरात
याबाबत सतीश काकडे यांनी सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना याबाबत पत्र दिले आहे. काकडे यांनी दिलेल्या पत्रात म्हनटले आहे की, सोमेश्वर च्या संचालक मंडळास कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, तसेच खर्च करण्याची मर्यादा देखील साखर आयुक्त यांनी ठरवुन दिलेली आहे, गाड्या देखील वापरता येणार नाहीत. आपण सरकारी नोकर आहात शासनाने आपली नियुक्ती केलेली आहे. तेव्हा कारखान्याचे हित लक्षात घेता चेअरमन व संचालक मंडळाला यापुढे गाड्या देवु नयेत, दहा हजार रूपयांच्या वर कुठलाही खर्च करावयाचा असल्यास व नविन कुठलीही ऑर्डर द्यावयाची असल्यास साखर आयुक्त यांची पुर्व परवानगी घेतल्या शिवाय संचालक मंडळाला परवानगी देवु नये. तसेच कुठलेही धोरणात्मक निर्णय घेवु नयेत कारण हे काळजीवाहु संचालक मंडळ आहे याची आठवण चेअरमन यांना करून द्यावी. कारखान्याची पुर्व हंगामी कामे करीत असताना सर्व खर्चासाठी साखर आयुक्त कार्यालयाची परवानगी कार्यकारी संचालक या नात्याने घ्यावी. सन २०१३ साली ही संचालक मंडळाची मुदत संपली होती व त्यावर मी तकार दाखल केली होती त्यानुसार साखर आयुक्त यांच्या दि.१९/३/२०१३ च्या परिपत्राकनुसार तत्कालीन प्रादेशिक सह संचालक यांच्या आदेशानुसार श्री सोमेश्वर कारखान्याला धोरणात्मक निर्णय व खर्चा बाबत निर्णय न घेणे बाबतचे आदेश दिले होते त्याची प्रत सोबत जोडत आहे. तरी तात्काळ याची सर्व अंमलबजावणी करण्यात
यावी.
गेल्या आठवड्यात माझी ११ व्या महिन्यातील ८ एकर २६५ उस जातीची लागण घरातील इतरांच्या
नावावर गळीतासाठी आला. परंतु सदर उस गाळपाला जात असताना माझा उस परस्पर पेटवुन गाळपास आणला आहे. त्यामुळे माझे व पर्यायाने कारखान्याचे देखील नुकसान केले आहे. सभासदांच्या जळीत उसास टनाला २०० ते ५०० रू. प्रति मे.टन कपात केली जाते. याची जाणीव आपणास असेलच, परंतु माझ्या उसाची लागण असताना माझी परवानगी न घेता पेटवुन उस गाळपास आणला आहे. त्याबाबत फोन वरून याची कल्पना आपणास दिली होती व आपण त्यावर कारवाई करून योग्य तो निर्णय घेवु असे सांगितले होते. परंतु १४ दिवस झाले तरी देखील आपण कोणतीही कारवाई अथवा निर्णय याबाबत घेतला नाही व मला ही याबाबत कळविले देखील नाही. तरी या विषयावर आपण उचीत कारवाई करणे गरजेचे आहे व माझी जी नुकसान भरपाई झाली आहे. त्याची वसुली ही कार्यकारी सचांलक या नात्याने आपण द्यावी कारखान्याकडुन नाही कारण आपल्याला चेअरमन यांनी जी स्वतंत्र क्रेटा ही १७ लाख रूपये किंमतीची गाडी दिली आहे ते तुम्ही चांगले काम केले आहे म्हणुन दिली का? इतर हित जोपासण्यासाठी दिली याचे कोडे मला व तमाम सभासदांना ही कळलेले नाही. माझ्या माहिती प्रमाणे कोणत्याही कारखान्याने त्यांच्या कार्यकारी संचालकांना स्वतंत्र गाडी दिलेली नाही. तरी याचा पण खुलासा आपण लेखी स्वरूपात करावा व माझ्या उसाची भरपाई आपल्या पगारातुन करावी. कारखान्याला तोषीश न लावता, शेतकी खात्याकडुन वसुल न करता, ऊसतोडणी कामगार यांच्या कडुन भरपाई न घेता आपल्या वैयक्तिक खिशातुन भरपाई द्यावी.
आपल्या कारखान्याचे फायनान्स मॅनेजर यांची दि.३१/५/२०२० रोजी काम करण्याची मुदत संपत
आहे त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यासाठी गेल्या आठवड्यात संचालक मंडळाची मिटींग बोलविण्यात आली असे
समजते त्या मिटींगमध्ये बहुमताने कदम बी. एन यांना एक वर्ष मुदतवाढ द्यावी असे ठरले अशी माहिती सभासद या नात्याने मला मिळाली. परंतु या दोन ते तीन दिवसांत असे समजते की साखर आयुक्त यांच्या धोरणानुसार त्यांना मुदतवाढ द्यायची नाही असा आपण व चेअरमन निर्णय घेणार आहात असे कळते.
मग आपण संचालक मंडळाची मिटींग कशा करीता बोलविली याचे लेखी उत्तर मला मिळावे. साखर।आयुक्त यांचे मुदतवाढ देण्यात येवु नये असे पत्र असल्यास त्याची ही प्रत मला मिळावी. साखर आयुक्त यांच्या आदेशा प्रमाणे आपण वागणारच असाल तर कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष धुमाळ हे मागे अनाधिकृतपणे कार्यकारी संचालक म्हणुन वावरत होते मी तकार केल्या नंतर साखर आयुक्त यांनी त्यांना तात्काळ आदेश देवुन पदावरून कमी करण्यास सांगितले होते, तरी ही ते अनेक महिने कार्यकारी संचालक म्हणुन काम करीत होते व सह्या ही करीत होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ
दिली होती. त्याची वसुली करणे संबंधी मी त्यावेळी पत्रव्यवहार सुध्दा केला होता व तसे आदेश देखील।दिलेले होते परंतु त्याची अंमलबजावणी कारखान्याने का केली नाही याचाही लेखी खुलासा मला मिळावा.
कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक धुमाळ यांच्या बाबतची साखर आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाची सर्व कागदपत्रे
माझ्याकडे आहेत याची कृपया नोंद घ्यावी आपण जर साखर आयुक्त यांच्या आदेशाचे पालन करणार।असाल तर मी आपणास साखर आयुक्त यांचे धोरणात्मक व इतर निर्णय न घेण्या संबंधीचे दि. १८/१०/२०१३ चे पत्र देत आहे. उद्याच चेअरमन व आपण यांनी कारखाना सभागृह सोडुन दुसऱ्या ठिकाणी कारखान्याची काही कोटींची आर्डर देण्यासाठी व काही धोरणात्मक निर्णय घेणेसाठी संचालक मंडळाची मिटींग।बोलविली आहे असे समजते. तरी या पत्राव्दारे आपणास नम्रपणे कळवु इच्छितो की मी वरील बाबी सांगितल्या प्रमाणे आपण याची अंमलबजावणी करावी व वरील सर्व माहिती मला लेखी स्वरूपात ८ दिवसांमध्ये मिळावीअन्यथा मला नाईलाजास्तव कार्यकारी संचालक या नात्याने आपणा विरोधात मा हायकोर्ट मुंबई येथे दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी,असे सतीश काकडे यांनी पत्रात म्हनटले आहे.
COMMENTS