क्षत्रिय सगर राजपूत समाजातील तरुणांनी संशोधित केला समाजाचा अति प्राचीन इतिहास
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निर्धारित लक्ष्य साफ असेल, हेतु शुद्ध असेल तर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करुन दाखवता येतात आणि परमेश्वर देखील अशा कार्यास आशिर्वाद देतो याचे जीवंत प्रात्यक्षिकच करुन बारामती तालुक्यातील काही तरुणांनी क्षत्रिय सगर राजपूत (सगर मराठा) सेवा संघ या संघटनेच्या माध्यमातून हे दाखवून दिले.
मध्यंतरी प्रसिद्ध लेखक रंगनाथ पठारे यांनी देखील एक कादंबरी आपल्या स्वतःच्या मूळ कुळावर लिहीली होती. अजून एक अमेरिकेतील अॅलेक्स हेले नावाचा लेखक स्वतःचे मूळ शोधत द.आफ्रिकेत पोहोचला होता त्यावर त्याने खुप सुंदर पुस्तक लिहिले *"रुटस्"*.
अशीच ही स्वतःचे मूळ शोधायची या तरुणांची कहाणी असली तरी या कहाणीतला संघर्ष खुप वेगळा आणि नकोसा वाटणारा आहे. स्वतःच्या समाजातील जवळच्याच लोकांशी संघर्ष करत या तरुणांनी स्वतःचे मुळ जबरदस्त अशा अतिप्राचीन ऐतिहासिक पुराव्यांसहित शोधून काढले आणि अगदी काळाच्या ओघात नामशेष होऊ घातलेल्या आपल्या समाजास नवसंजीवनी दिली.
उत्तर हिंदुस्थानाने आजवर अनेक यवनी आक्रमणांचा सामना केलेला आहे.हजार वर्षांपूर्वी सातत्याने होणा-या क्रुर यवनी आक्रमणांपासून स्वतःचा धर्म आणि जीव वाचवण्यासाठी लढाया करत राजपूतान्याचा प्रदेश आणि विशेषतः माळव्यातील रेवाकांठा प्रदेश सोडून काही राजपूत समाज दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्रात सातारा ,कोल्हापूर, कोकण आणि नंतर विदर्भ व नीरा-भीमेच्या खो-यात स्थिरावला. यात बहुसंख्येने क्षत्रिय सगर राजपूत आणि परमार राजपूत(फलटणचे नाईक निंबाळकर) होते.
महाराष्ट्रात आल्यावर देखील त्यांनी आपला क्षत्रिय धर्म सोडला नाही. या विषयावर संशोधन करत असताना संघटनेने दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्रातील सगर राजपूतांचा शिवकालीन इतिहास पुराव्यांसहित शोधून तो संकलित देखील केला आहे. समशेरबहाद्दर संताजी आटोळे, सेनाबारासहस्त्री बजाजी आटोळे, सरलष्कर जनकोजी कोकणे, सरलष्कर सेट्याजी खोमणे अशा सामान्य जनमाणसांना अपरिचित योद्ध्यांचा इतिहास त्यानिमीत्ताने संघटनेने पुढे आणला. त्यासाठी संघटनेतील तरुणांनी पदरचे लाखो रुपये आणि स्वतःचा किमंती वेळ खर्च करून मध्यप्रदेश, विदर्भ, गुजरात, मराठवाडा असा अनेकदा हजारो किमी चा प्रवास केला.या प्रवासात शेकडो समाजबांधवांच्या ,इतिहास संशोधकांच्या,राजेरजवाड्यांच्या गाठी-भेटी घेतल्या. हजारो कागदपत्रे हाताळली,अगदी अमेरिकेतील विद्यापीठांतून हजारो रुपये किमंतीची काही पुस्तके मागवून वाचून काढली.त्या माध्यमातून सगर राजपूतांचा महाराष्ट्रातील इतिहास समोर आला तरी हे तरुण अस्वस्थ होते कारण आपण कोठून आलो, आपले मूळ काय याविषयी त्यांना केवळ तोंडी माहिती नको होती तर ठोस ऐतिहासिक पुरावे हवे होते. हजारो वर्षांपूर्वीचे हे पुरावे कसे मिळतील हा मोठा प्रश्न असला तरी हे तरुण चिकाटी सोडायला तयार नव्हते.
*"अगर तुम पुरे दिल से किसी चीज को चाहो तो वो चीज तुम्हे दिलाने के लिए पुरी कायनात जुट जाती है."* या शाहरूखच्या चित्रपटातील वैश्विक सत्य(universal truth) असलेल्या डायलाॅगचाच या तरुणांनी साक्षात अनुभव घेतला.
सुरुवातीला अगदी पुणे येथील पुराभिलेखच्या ऑफिसच्या दारात देखील उभे केले जात नव्हते तिथे गुजरात मधील अर्केलाॅजिकल सोसायटी ऑफ इंडिया असेल किंवा लंडनची ब्रिटिश लायब्ररी असेल या फार दूरच्या गोष्टी होत्या. पण परमेश्वर आणि पूर्वजांचे पुण्यात्मे पाठीशी असतील तर या इंटरनेट आणि टेक्नाॅलाॅजीच्या युगात काय अशक्य आहे?
प्रचंड पत्रव्यवहार आणि ई-मेल्स यांच्या पाठपुराव्यानंतर संघटनेसमोर अक्षरशः जणू अलिबाबाची गुहाच उघडली. महाराष्ट्रातील सगर राजपूतांच्या इतिहासाचे एक खुप मोठे दालन उघडले गेले आणि हजार वर्षापूर्वीचा इतिहास ऑथेंटिक पुराव्यांसहित समोर आला.
राजपूतांच्यातील सगर कुळ हे अति प्राचीन असून इश्वाकु पासून चालू होणारे गंगेला पृथ्वीवर आणणा-या भगीरथाचे,सगर राजाचे आणि प्रभू रामचंद्रांचे हे कुळ आहे. तर महाराणा प्रताप आणि छ.शिवाजी महाराजांचे सिसोदिया कुळ एकमेकांचे शिरोधर म्हणजे भावकुळ आहेत.
महाराष्ट्रात राहणारे म्हणून 'सगर मराठा', माळव्यातील 'सगर मालवीय' तर सौराष्ट्रातील 'सगर सोरठीया' अशी प्रादेशिक नावे धारण झालेची स्पष्ट नोंद अर्केलाॅजिकल सोसायटी ऑफ इंडिया मध्ये आढळून येते. एवढेच नाही तर महाराष्ट्रात या समाजात प्रामुख्याने आढळून येणारी आडनावे आटोळे, गावडे, खोमणे, सोरटे, वायाळ,गाढवे, सांगळे, शिंगाडे,ताम्हाणे, धुमाळ, धायतोंडे यांची देखील हजार वर्षापूर्वीची ऐतिहासिक नोंद आढळून आली.
याशिवाय बारामती तालुक्यातील क-हा नदीच्या काठावर तरडोली गावात कासिम बारीद या तुर्की यवनाबरोबर सगर राजपूतांनी लढलेल्या युद्धाची नोंद देखील अर्केलाॅजिकल सोसायटी ऑफ इंडिया मध्ये मिळाली. या युध्दावर लिहीलेली एक चौपाही या ठिकाणी आढळून आली. जिच्यामध्ये अगदी बारामती तालुक्यातील अनेक आडनावे आणि गावांचा स्पष्ट उल्लेख आहे.हे युद्ध १४ व्या शतकात झाले होते. कासिम बारीद हा बहामनी सल्तनतीचा प्रधान मंत्री होता ज्याने १४९२ च्या दरम्यान बिदर सल्तनतची स्थापना केली आणि त्यानंतर त्याच काळात विजापूर आणि अहमदनगर सल्तनत स्थापन झाल्या. तर दुसरी चौपाही ही हजार वर्षापूर्वी सगर राजपूत (मराठा) गुजरात मधील पाटण येथे लढलेल्या युद्धाची आहे.
यह कहानी इ.स.१४९८ की है जब अहमदनगर सल्तनत काल मे तुर्क मुसलमान हाजी मरवान और कासिम याहया ने तरडोली के आसपास के सोलह गाव पर आक्रमण कर दिया था| उस युद्ध मे नागर,पिगळ और मराठी ब्राम्हणो ने भी सहाय कि थी, उसी युद्ध का वर्णन तरडोली गांव के कवि श्री. ब्राम्हण रायजी सयाजी पिंगळे ने गाये हुवे छन्दा चौपाई को संभाजयी ख्याजी राऊत ने संवत १८४९ मे चैत्र माह शुक्ल पूनम के दिन कागज पर हस्ताक्षर किए उस के कुछ छन्द और चौपाई आज भी जिंदा है।
COMMENTS