कोरोनावर लॉकडाऊन हा उपाय नसून सोशल डिस्टसिंग हाच त्याचा खरा उपाय : आ.संजय जगताप
पुरंदर : प्रतिनिधी
'कोरोनाच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतला होता की तीन दिवस सासवडमध्ये जनता कर्फ्यू लावला होता. मात्र याठिकाणी ज्यांचे ज्यांचे सेकंडरी कॉन्टॅक्ट आहेत त्यांची तपासणी रोजच्या रोज होत आहे. त्याचबरोबर जे लॉकडॉन मध्ये अत्यावश्यक सेवा सुरू करावे लागतात, त्याचबरोबर इतर सोयीसुविधा लोकांना पुरवावे लागतात इतर व्यवसाय सुरू करावे लागतात. त्यातच सातत्याने लॉकडाऊन झाला तर ते योग्य नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काही व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे हा प्रसार होतोय. युव्हन कलेक्टर ऑफिस सुद्धा मान्यता देत नाही त्याची मान्यता मागितली होती पण मान्यता दिली जात नाही आणि कोरोनावर लॉकडाऊन हा सोल्युशन नाहीतर सोशल डिस्टंसिंग हे त्याचे सोल्युशन आहे आणि प्रत्येकाने त्याचे पालन करणे, शासनाने दिलेले टाइमिंग व्यापाराच्या बाबतीत, शासनाने दिलेले नियमावली त्याचे तंतोतंत पालन करणे हे आपली जबाबदारी आहे असे मला वाटते' असे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने कोरोना संसर्गरोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर 'बिगिनिंग अगेन वन' ही मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर कोरोना गेल्यासारखे लोक वागू लागले. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने सासवड नगरपरिषद व पुरंदरच्या आमदारांनी सासवड मध्ये जनता कर्फ्यू तीन दिवसासाठी जाहीर केला होता. लोकाऊ या जनता कर्फ्यूला योग्य साथ दिली, मात्र शासनाच्या नियमावलीप्रमाणे जास्त दिवस कर्फ्यू किंवा लॉकडाऊन ठेवता येत नसल्याने तो कर्फ्यु शिथील करून जनजीवन पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत आमदार संजय जगताप बोलत होते ते म्हणाले लॉकडाऊन हा कोरोनावर उपचार नाही तर सोशल डिस्टंसिंग मास्कचा वापर, सॉनिटायझरचा वापर हा कोरोना वरचा उपचार आहे. त्यामुळे व्यापार पेठ व दुकाने बंद ठेवून लोकांची हाल व नुकसान होत असते असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी सर्व व्यवहार सुरळीत ठेवून लोकांनी, व्यवसायिकांनी सोशल डिस्टंसिंग तंतोतंत पालन करावी तसेच प्रभावित क्षेत्रात संसर्ग वाढणार नाही यासाठी लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
COMMENTS