शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला सहकार टिकला पाहिजे :- रामभाऊ भगत
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
अलीकडच्या काळात सहकारी साखर कारखाने बंद पडतात व नंतर ते खाजगी होतात, पूर्वी खाजगी बंद पडलेले कारखाने सहकारी साखर कारखाने विकत घेत होते खाजगी कारखाने ज्या पद्धतीने व्यावसायिक काटकसर करून कारखाना चालवता त्याप्रमाणे सहकारी साखर कारखाने चालविले पाहिजेत तरच सहकार टिकेल. असे मत सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामभाऊ भगत यांनी व्यक्त केले.
कोऱ्हाळे ता बारामती येथे भगत यांच्या ज्ञानदीप या निवासस्थानी पत्रकारांशी गप्पा मारताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, सहकारी साखर कारखाने उभे करताना शेतकऱ्यांनी शेअर्स खरेदी करताना सोसायटीतून कर्ज घेऊन कारखाने उभे केले आहेत याची जाणीव ठेवत सहकारी संस्थातील सर्वांनी उच्च अभ्यास करून संस्था भरभराटीस नेली पाहिजे पाहिल्याचे मत व्यक्त केले १९७५ ते २००७ या कालावधीत कारखाना संचालक व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिल्याची माहिती देऊन भगत पूढे म्हणाले की,
नवीन होणाऱ्या व्यक्तीनी पदे शोभेसाठी न वापरता त्या संस्थेचा बारकाईने अभ्यास करून संस्थेला भरभराटीस आणण्यास मदत केली पाहिजे . स्वर्गीय बाबालाल काकडे यांनी ही १९७५ ते ८५ पर्यंत सोमेश्वरचा चांगला भाव दिला नंतर ९० सालीच्या विस्तारवाढ मध्ये काही त्रुटी राहिल्याने कारखान्याचा दर शेजारच्या कारखान्याच्या तुलनेत कमी निघाला त्यामुळे नाराजी तयार होऊन सत्तांतर घडले. आज सोमेश्वर कारखाना जिल्ह्यातच काय राज्यात आघाडीवर असून ऊस गाळप, साखर पोती, साखर उतारा आणि ऊसदर या सर्वच बाबतीत आघाडीवर आहे, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कारखान्याने उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारून अल्पावधीत सोमेश्वरने राज्यात नावलौकिक मिळविला, शेतकऱ्यांनी एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत व त्यांना कारखान्याने त्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मत त्यांनी मांडले. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखाना १९९२ पासुन विविध प्रकल्प उभारत यशस्वी घोडदौड करत आहे .पत्रकारांशी गप्पा मारताना भगत यांनी सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक प्रवास उलगडत आपली परखड मते व्यक्त केली .
यावेळी को-हाळचे माजी सरपंच दत्तात्रत भगत, उद्योजक बाळासाहेब हगारे, संचालक सुनील भगत ,डॉक्टर यशवंत भगत, राष्ट्रवादीचे युवा नेते प्रसाद भगत, विलासराव भगत मोहन भगत यांच्यासह ज्येष्ठपत्रकार दत्ता माळशिकारे,संतोष शेंडकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप ,राजेंद्र गलांडे ,युवराज खोमणे,तुषार धुमाळ उपस्थित होते .
_____________
जुन्या आठवणींना उजाळा देताना भगत बापू आवर्जून सांगितले की विशिष्ठ लोकांच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या व बहुजन समाजाच्या हातात देण्याचं काम स्वर्गीय मुगुटआप्पा काकडे यांनी केले
COMMENTS