जेजुरीत खंडोबाच्या पहिल्या पायरीवर नवविवाहित जोडप्यांची गर्दी
पुरंदर : प्रतिनिधी
देऊळ बंद जेजुरीत नवविवाहित जोडप्यांची रोज गर्दी होत आहे. भंडाराप्रसाद, धार्मिक साहित्याची ही चोरून विक्री होत आहे. पालिका व पोलीस प्रशासन हतबल झाले असून. पालिकेकडून अचानक दंड वसूलीची लुटुपूटूची कारवाई केली जात आहे. पुरंदर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने भाविक व स्थानिकांना धोका निर्माण झाला आहे.
देशभरात पसरलेला कोरोना महामारीत महाराष्ट्रात अव्वल नंबर आहे. असे असून हि परस्तिथी पहाता शासनाने राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्र मंदिर आणि परिसरांना लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व मंदिरे बंद असल्याचे चित्र दिसत आहे. राज्याचे कुलदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देव नगरीत मात्र कोरोना काळातील झालेल्या लगीनघाईतील दररोज शेकडो नवविवाहित जोडपी येत आहेत. जेजुरी गडाच्या महाद्वार नंदी चौकांत नवदांपत्य गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
जेजुरी नजीकच्या अनेक खेडे गावात रुग्ण सापडण्यास सुरवात झाली आहे. एका पौंजीटिव्ह रुग्णाचा मृत्य हि झाला आहे. अशा घटना घडत असताना जेजुरीत नववधू वरांची येण्याची संख्या आता लक्ष वेधून घेत आहे. पोलीस बंदोबस्त असून देखील हि नवविवाहित जोडपी मंदिराच्या पूर्व व दक्षिण मार्गावरील प्रवेशद्वारा पर्यंत पोहचतात कशी असा प्रश्न पडतो आहे. वास्तविक पहाता हायवे लगत असलेल्या उघडा मारुती चौकात असलेल्या प्रवेश ठिकाणा वरून जोडपी आणि वऱ्हाडी मंडळीना माघारी पाठवण्याचा पुरेपूर प्रयत्न पोलीस करत आहेत. पण जोडप्यांना सोबत कुणी मोठ्या पोलीस अधिकारायंची तर राजकीय नेत्यांची पत्र घेऊन आलेल्या बड्या नवविवाहित जोडप्यांना सोडावे लागत आहे, तर सामान्य गोर गरिबांनी तेथूनच परतावे लागते असे दृश्य सद्या दिसून येत आहे. कधी तरी चौकातून फेरफटका मारणाऱ्या पालिका विभाग कर्मचारी अधिकार्याने आता मास्क न घालणाऱ्या जोडप्यांना विशेष दंड वसुली आकारली जात असून ते दंड भरले कि पायथा दर्शन दिले जाते. स्थानिक लोकांच्या कडून धार्मिक व्यवसाय करणाऱ्या सामान्य वाघ्यामुरळीना दंड भरण्याची सक्ती होत असते. तर चोरून भंडारा खोबरे प्रसाद विक्री केली जात असते. मात्र नगरपालिका पोलीस प्रशासन हे बघून हि हतबल झाल्याचे चित्र दिसून आले आहे तर खडबडून जाग्या झालेल्या देवसंस्थान कमिटीने दोन शिपाई कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे सदया शासनाने लोकांची सुरक्षितता पहाता अत्यावश्यक बाबी बाबत जरी ढील दिली असली तरी देऊळ मात्र पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील नवविवाहित जोडप्यांचा लवाजमा मात्र अद्यापही थांबवण्यात स्थानिक प्रशासनाल आले नाही हि दुदैवाची बाब म्हणावी लागेल.
COMMENTS