नीरा खोऱ्यात आजही २३.२० टक्के पाणीसाठा
पुरंदर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांची जिशनदायनी असलेली नीरा नदी व नदीवरील धरणांची आजची स्थीती समाधानकारक आहे. गेल्या वर्षी जूनच्या सुरवातीलाच नीरेच्या खोऱ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. मात्र यावर्षी जून महिना आर्धा संपला तरी नीरा खोऱ्यात अजून तरी सुमारे १२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नीरेच्या खोऱ्यात तब्बल ११.२१ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा नीरेच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी पावसाने सुरवातीला चांगलीच ओढ दिली होती, मात्र यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाले आहे. धरणात पाणीसाठा पुरेसा आहे. त्यामुळे सध्या वीर धरणातून नीरा डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. मागील पाऊस उशिरा आल्या नंतर परतीचा पाऊस हि जादा बरसला. तो नीरा खोऱ्याला एक बोनस देऊन गेला. सुरवातीला कमी पडलेल्या पावसाने नंतर सरासरी ओलांडली. उशीरा आलेल्या पावसामुळे रब्बी हंगामात पाण्याचा वापर कमी झाला होता. त्यामुळे पाण्याची मागणी रब्बीच्या हंगामात घटली होती. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तरी नीरेच्या खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर धरणात पाणी शिल्लक आहे.
आज दि. २१ जून रोजी नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरणात १.९४ टी एम सी म्हणजे एकूण क्षमतेच्या १६ टक्के पाणीसाठा आहे. भाटघर धरणत ६.२५० टी. एम. सी. म्हणजेच क्षमतेच्या २७.५९ टक्के पाणीसाठा आहे. वीर धरणत २.११० टी. एम. सी.म्हणजेच क्षमतेच्या २२.४२ टक्के पाणीसाठा आहे. तर गुंजवणी धरणत ०.९७० टी. एम. सी. म्हणजेच क्षमतेच्या २४.५७ टक्के एवढे पाणी शिल्लक आहे.
सध्या वीर धरणाच्या डाव्या कालव्यातून ६७५ क्यूसेक्स तर उजव्या कालव्यातून ८५२ क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नीरेच्या खोऱ्यात एकूण ११.२१४ टी. एम. सी. एवढा पाणीसाठा असून तो एकूण साठ्याच्या २३.२० टक्के एवढा आहे. मागील वर्षी याच तारखेला नीरा खोऱ्यात केवळ १.८३९ टी. एम. सी. म्हणजेच ३.१८ टक्के पाणी साठा होता.
COMMENTS