जिल्हा बँकेचे शेतकरी पीक कर्जापासून वंचित : पीक कर्जातून मध्यम मुदत कर्ज वसुलीची सक्ती
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शेतकरी आणि जिल्हा बँक यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. शेतकऱ्याची संपूर्ण अर्थव्यवस्था ही जिल्हा बँकेवरच अवलंबून असते. मात्र लोकडाऊन मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच पीककर्जातून मध्यम मुदत कर्जाचे हप्ते वसूल करण्याचा हट्टहास जिल्हा बँकेने घातला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यातच असा प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी हा पुणे जिल्हा म.सह.बँक यांच्याकडून विविध सोसायटी मार्फत पिककर्ज घेत असतो. सध्या शासनाने केलेल्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेले शेतकरी तसेच पात्र नसलेले शेतकरी यांना त्यांनी उचललेले मध्य मुदत कर्ज थकीत असल्यामुळे पिक कर्ज देण्यासाठी नकार दिला जातोय सध्या शेतकरी अडचणीत असल्यामुळे महाराष्ट्र सरकार वारंवार घोषणा करतेय की पिककर्ज वाटप करा तसेच जी बँक पिककर्ज वाटप करत नाही त्या बँकेवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांना बिनशर्त पीक कर्जाचे शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा दिल्या जात आहेत. आज पुणे जिल्ह्यातील लाखो शेतकरी पिककर्ज मिळविण्यासाठी धडपड करतोय आणी बँक व सोसायटी शेतकऱ्यांना पिककर्ज मंजूर करत नाही. आणि जरी मंजूर केले तरी त्यातून मध्यम मुदत चे हप्ते घेण्याचा सोसायट्या आणि जिल्हा बँकेचा हट्टहास सुरू आहे. सद्या दुबार पेरण्या तसेच उसाच्या लागवडीसाठी तसेच विविध बी बियाणे, औषधे खते यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. मात्र सोसायटी आणि बँकांकडून विविध अटी घातल्या जात असल्याने शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहत असून शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सोसायट्यांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करून माध्यम मुदत भरण्यासाठी सक्ती
जिल्ह्यातील शेतकऱ्यापुढे दुबार पेरणीचे संकट, अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा मोठा फटका बसला आहे, त्यातच अनेक कंपन्यांचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच सोसायच्या आणि जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करून मध्यम मुदत भरण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडला आहे.
COMMENTS