पुरंदर चे नाझरे धरण ८५ टक्के भरले
मोरगाव : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण आज सकाळी १० वाजता ८५ टक्के भरले असून उद्या दिनांक १६ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत धरणावरील २६ स्वयंमचलीत दरवाजे उघडण्याची शक्यता आहे . यामुळे नाझरे धरणातुन सातशे ते आठशे क्युसेस पाण्याचा विसर्ग स्वयंचलित दरवाजातून होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नाझरे धरण शाखाधीकारी एस . जी . चौरंग यांनी दिलेला आहे .
पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणाची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट ( पाऊण टीएमसी ) एवढी आहे. आज दि १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरण ८५ टक्के भरले आहे . नारायणपूर, सासवड परिसरात मोठा पाऊस होत असल्याने धरण क्षेत्रात चौदा हजार क्यूसेस पाणी येत आहे . तर उद्या दिनांक १६ रोजी पहाटे ४ वाजता पुर्ण क्षमतेने धरण भरणार आहे .
दिनांक १६ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडणार आहे . यामुळे नाझरे धरण शाखाधिकारी एस . जी . चौलंग यांनी परीपत्रकाद्वारे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी आपले पशुधन तसेच नदी पात्रालगतच्या विद्युत मोटरी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आवाहन केले आहे . तसेच नदीपात्रामध्ये रात्री कोणीही न जाण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे. परीपत्रकानंतर आज याबाबत तरडोली व परिसरातील ग्रामपंचायतीने दवंडीद्वारे गावच्या सतर्केचा ईशारा दिला आहे.
......................................................
तरडोली ता . बारामती येथील पाझर तलाव गतवर्षाप्रमाणे नाझरे धरणातुन पोटचाऱ्याद्वारे भरण्याची मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे . येथील तलावा काठी असलेल्या विहरीवर सहा गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना व शेकडो एकर शेतजमीन जलसिंचनासाठी आवश्यक आहे .
शेतकरी : भालेराव भोसले
.......................................................
नाझरे धरण पुर्ण क्षमतेने भरणार असल्याने बारामती व पुरंदर तालुक्यातील पन्नास गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी योजनांचा प्रश्न यंदाही मार्गी लागणार आहे . तर नाझरे ,जवळार्जुन , आंबी , मावडी , मोरगांव , जोगवडी येथे शेतकऱ्यांच्या जमीनीस पाण्याचे आवर्तने मिळणार आहेत .
......................................................
COMMENTS