धरण क्षेत्रात संततधार : मागील वर्षीच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात संततधार सुरू झाली असून धरणांची पातळी वाढू लागली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वच धरणे निम्म्याने कमी आहेत.
या वर्षी जून महिन्यापासूनच सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. मात्र गेल्या वर्षी आजच्या रोजी जवळपास सर्वच धरणात १००% पाणी साठा होता त्या तुलनेत या वर्षी धरणांमधून अजून ४० ते ४५% पाणीसाठा आहे.
धरणपाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे, मात्र हा पाऊस धरणक्षेत्रात नसल्याने धरणांची पातळी आजूनपन ५० टक्केच्या आताच गुटमळत आहे.
धरण २०१९ २०२०
भाटघर १००% ४७%
देवधर ९८% ३४%
वीर ९५% ४६%
गुंजवणी ९३% ६२%
COMMENTS