जमिनीच्या आरोग्यासाठी कृषीकन्या अश्विनी गोडसे हिची शेताच्या बांधावर जागृकता
भोर : प्रतिनिधी माणिक पवार
रासायनिक शेतीमुळे शेतातील मातीची झालेली हानी रोखण्यासाठी निंबोळी अर्क हा रामबाण उपाय असुन सेंद्रीय शेतीबाबत शेतकरयांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनी कृषीकन्या अश्विनी गोडसे हिने शेतकरयांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन निंबोळी अर्काचा उपयोग व प्रात्याक्षिक सादर करून जागृकता निर्माण करत आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राबवण्यात येणारया कृषी जागृकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि महाविद्यालयातील कृषीकन्या अश्विनी गोडसे नसरापूर परिसरातील शेतकरयांच्या शेतावर जाऊन निंबोळी अर्काबरोबरच बीजप्रक्रिया,जनावरांचे लसीकरण, बोर्डो मिश्रण तयार करणे, माती परिक्षण, सुक्ष्म अन्न द्रव्याच्या कमतरतेची लक्षणे ही माहीती देण्याबरोरच शुन्य उर्जा शितगृहाचे व एकत्मिक तणनियंत्रण प्रत्याक्षिकाचे अयोजन करुन शेतकरयांशी संवाद साधत आहे.
नसरापूर येथील प्रगतशिल शेतकरी कृष्णा फडतरे यांच्या शेतावर निंबोळी अर्काबाबत माहीती देताना अश्विनी हिने सांगितले कि, किड व किटकांमुळे शेती उत्पादनात मोठी घट येते याच्या नियंत्रणासाठी शेतकरी किटकनाशकांचा वापर करतात यामुळे किड नियंत्रणात येते उत्पादन वाढते. पिकाला उपयोगी असणाऱ्या मित्र किटकांचा सुद्धा नाश होतो व ही किटकनाशके पाणी व मातीला अपायकारक ठरतात. यासाठी नैसर्गिक वनस्पतीपासुन निर्मित निंबोळी अर्क हे जैविक किटकनाशक वापरल्यासा मातीची उत्पादन क्षमता कायम राहुन किडीचा नाश होतो मित्र किटकांची वाढ होते पर्यायाने रासायनिक खता शिवाय पिकाचे उत्पादन चांगले होते व शेतकरयांचा फायदा होतो. अश्विनी गोडसे हिला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य संदिप गायकवाड, प्रा. शरद वळवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
COMMENTS