भोर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : प्रहार जनशक्तीची मागणी
भोर : प्रतिनिधी
अवकाळी पावसाने भोर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले असुन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे झालेल्या या नुकसानीची तुटपुंजी भरपाई न करता तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा सेवक संतोष मोहीते,लाला सुर्वे,जगन्नाथ तनपुरे, राजु तनपुरे यांनी भोर तालुका तहसिलदार कचेरीत मागणीचे निवेदन दिले नायब तहसिलदार मृदुला मोरे यांनी त्यांचे निवेदन स्विकारले.
या बाबत माहीती देताना संतोष मोहीते यांनी सांगितले कि,13 आक्टोंबर पासुन सुरु असलेल्या पावसाने भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती पीकाचे नुकसान झाले आहे अतिवृष्टी मुळे भात पिकासह टोमँटो, सोयाबीन,ऊस हे नगदी पीक हातचे गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे शेती मधील फळबागांचे देखिल मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेतीचे बांध,दगडी ताल,माती वाहुन गेल्याने शेती पुन्हा करणे अवघड झाले आहे आशा परिस्थितीत शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत असुन त्यामधुन शेतकरयांना तुटपुंजी मदत मिळणार आहे त्या ऐवजी ओला दुष्काळ जाहीर केल्यास शेतकरयांना नियोजनपुर्वक मदत मिळेल व या संकटातुन सावरण्याचा मार्ग मिळेल यासाठी तालुक्यात ओला दुष्काळच जाहीर करावा अशी मागणी आम्ही निवेदनाव्दारे केली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चु कडु यांनाही या बाबत निवेदन पाठवले असुन तालुक्यातील शेतकरयांसाठी हा निर्णय घेण्यास शासनाकडे पाठपुरावा कराण्याची विनंती केल्याचे मोहीते यांनी सांगितले आहे.
COMMENTS