सभासद उपाशी, संचालक मंडळ काजुशी : सतिश काकडे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०१९-२० चा अंतिम उस दर ३०००/- रू. प्रति मे.टन व कामगारांनाही उच्चांकी बोनस १५ टक्के जाहिर करून सभासदांना व कामगारांना दिवाळी भेट दिली व
खऱ्या अर्थाने न्याय देवुन पुणे जिल्ह्यात उच्चांकी अंतिम उस दर जाहिर केल्या बद्दल प्रथमत: चेअरमन, संचालक
मंडळ व कार्यकारी संचालक यांचे सभासद, कामगार व कृती समितीच्या वतीने जाहिर अभिनंदन !
शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हनटले आहे, वास्तविक श्री सोमेश्वर कारखान्यावर कोणतेही कर्ज नाही कारखाना कर्ज मुक्त झाला आहे असे वेळोवेळी
सांगुन चेअरमन यांनी स्वतःची पाठ सुध्दा थोपटुन घेतली व त्याची फ्लेक्सबाजी करून कारखान्याच्या पैशांतुन
सभासदांना जेवणावळी देखील घातल्या होत्या. आपल्या कारखान्याने मागील ३ वर्षापासुन गाळप, रिकव्हरी, साखर पोती, उपपदार्थ व को-जन यांचे उच्चांकी उत्पन्न घेतलेले आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत अंतिम उस दरात कोठेही कमी पडणार नाही एक नंबरचा उस दर देणार असे वेळोवेळी वर्तमान पत्रांमधुन व सभांमधुन चेअरमन बढाया मारत होते. तसेच सहा महिन्यांपूर्वी माळेगाव कारखाना निवडणुकीच्या सभेत देखील गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी सोमेश्वर जादा भाव देईल असे मनोगत व्यक्त केले होते. व त्याचेच फळ म्हणुन आज खऱ्या आणि सभासदांना ३०००/- रू. प्रति मे.टन अंतिम भाव जाहिर करून व कामगारांना १५ टक्के बोनस जाहिर केले! कोरोनामुळे वार्षिक सभा होणार नसल्यामुळे चेअरमन यांना कोण विचारणार? चेअरमन यांनी जो उच्चांकी भाव व
कामगारांना उच्चांकी बोनस जाहिर कोल्याने सभासदांची व कामगारांची दिवाळी गोड करून कल्याणच केले असल्याने सन २०१९-२० चा अंतिम भाव व बोनस सभासद व कामगार कदापीही विसणार नाहीत अशी अपेक्षा !
वास्तविक शेतकरी कृती समितीने मागील आठवड्यात ३५००/- रू. प्रति मे.टन अंतिम उस दर जाहिर करावा अशी मागणी केली ती योग्यच होती. कारण सन २०१८-१९ या वर्षाच्या साखर विकी दरापेक्षा सन २०१९-२० यावर्षांची साखर विकी चढ्या भावाने केलेली आहे. उपपदार्थांचे उत्पादन देखील मागील वर्षी पेक्षा जादा झालेले आहे व विकी ही जादा झाली आहे. तसेच विज विक्री सुध्दा चांगली झालेली आहे. तसेच कारखान्याने सभासदांच्या उस बिलातुन उस दर देण्यासाठी किंमत चढउतार निधी २० कोटी रूपये कपात केलेले आहेत. (की जे कायद्याने फक्त उस दर देण्यासाठीच वापरावे लागतात) त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाने किमान ३५००/रू. प्रती मे.टन अंतिम उस दर जाहिर करण्यास काहीच अडचण नव्हती याबाबत कृती समिती आजही ठाम आहे. परंतु चेअरमन यांनी उच्चांकी ३०००/- रू. प्रती मे.टन उस दर व कामगारांना १५ टक्के योनस जाहिर करून
सभासदांची व कामगारांची दिवाळी गोड केल्याने आत्ता आम्हाला वाटत आहे की आमचाच कारखान्या बाबतचा
अभ्यास कमी पडत आहे का आम्हीच कुठे तरी चुकत आहे ! अनेक सभासद मला व्यक्तीशः भेटुन व फोन करून सांगतात की गेल्यावर्षी ३३००/- रू. प्रती मे टन भाव मिळाला होता. यावर्षी सर्वच गोष्टींमध्ये सोमेश्वर पुढे असल्यामुळे ३३००/- रू. प्रती मे.टना पेक्षा निश्चित जादा
भाव मिळेल अशी अपेक्षा असताना कारखान्याने मात्र ३०००/- रू. प्रती मे.टन भाव कसा दिला? कारण ज्या अर्थी चेअरमन यांनी ३०००/- रू. प्रती मे.टन अंतिम भाव जाहिर केला त्यावरून चेअरमन यांचा ३५ वर्षांचा प्रदिर्घ अनुभव असल्याने व सलग ७ वर्ष चेअरमन असल्याने त्यांनी कारखान्यामध्ये कामगार कॉलनी, कॉलेज इमारत बांधकाम, बॉल कम्पाउंड, गोडावून, अनेक ठिकाणी अंतर्गत PCC, अंतर्गत रस्ते अशी अनावश्यक करोडो रूपयांची कामे कारखान्यामध्ये चालु आहेत. या प्रकारे चेअरमन यांनी अनेक कामांचा धडाका
लावला आहे.
तसेच गेले ५ ते ७ वर्षात चेअरमन यांनी आत्ता पर्यंत सुमारे ६१ कोटी ३२ लाख रूपयांची भांडवली गुंतवणुकीची कामे केलेली आहेत यासाठी साखर आयुक्त कार्यालयाची परवानगी घेतली किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. व.आत्ता प्रस्तावित विस्तावाढीची सुमारे १४२ कोटी ६५ लाख रूपयांची कामे कारखाना करणार आहे तसेच आजपर्यंतचे
१३३ कोटी रूपयांचे कर्ज कारखान्यावर आहे (साखर माल तारण कर्ज सोडुन) असे अंदाजे एकुण २७५ कोटी रूपयांचे कर्ज कारखान्यावर होणार असुन व त्यावरील घसारा व व्याज़ या पोटी प्रती मे.टन ४००/- रू. सभासदांच्या उस बीलातुन जाणार आहेत. म्हणजेच सभासदांना किमान ५ ते ६ वर्ष उसदर प्रती मे.टन ४००/- रू. कमी मिळणार।आहेत. म्हणजेच मागील दिवस पुढे येणार आहेत याची सभासदांनी दखल घ्यावी. तसेच चेअरमन हे काही।संचालकांना व त्यांच्या जवळच्या सभासदांना व्यक्तीशः, काही कामगारांच्या नावे व काही त्रयस्थ व्यक्तींच्या नावे लाखो रूपये अॅडव्हान्स गेली ७ वर्ष दिले जात आहेत अशी सुध्दा खात्रीशिर माहिती मिळत आहे. तसेच ही रक्कम दरवर्षी नवेजुने करून बिनव्याजी दिली जाते. वरील सर्व बाबींवर सभासदांनी वेळीच नियंत्रण आणले नाही तर
आत्ताही व भविष्यातही FRP पेक्षा जादा भाव मिळणार नाही याची सभासद व संचालक मंडळाने नोंद घ्यावी. तसेच
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये चाललेल्या गैरप्रकाराबाबत आम्ही लवकरच सविस्तर खुलासा जाहिर.करणार आहे. कारण सात हजार सभासदांनी पैसे न घेता माझ्यावर व कृती समितीवर विश्वास ठेवुन जे मतदान केले त्यांच्यासाठी शेतकरी, सभासद व कामगार यांना जागरूक करण्याचे काम मी व कृती समिती करीत आलेलो आहे व भविष्यात देखील करीत राहणार आहे अशी हमी देतो..तसेच कारखान्याचे चेअरमन यांनी कारखान्याच्या विस्तारवाढी बाबत साखर आयुक्त कार्यालयात प्रस्ताव दाखल केला असुन लवकरच साखर आयुक्त कार्यालयातुन त्यास मान्यता मिळेल असे प्रशासनाकडुन सांगितले जाते याबाबत चेअरमन यांना आवाहन करण्यात येते की किमान आत्ला तरी विस्तारवादीची मान्यता मिळो अथवा न मिळो।निर्णय घेण्यापुर्वी कारखान्याचे जेष्ठ व अभ्यासु सभासद, संचालक मंडळ, VSI चे अधिकारी तसेच कृती समिती यांच्या बरोबर विस्तारवाढ व इतर बाबीं संबंधी तात्काळ मिटींग घेवुन चर्चा करावी व नंतरच विस्तारवादी संबंधीचा अंतिम निर्णय घ्यावा, याबाबतची सर्व माहिती मी अजितदादा पवार यांना देखील तशा प्रकारचे पत्र देवुन विनंती केली आहे. कारण साखर आयुक्त कार्यालयात विस्तारीकरणा बाबतचा जो प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे तो पुर्णपणे चुकीचा व दिशाभुल करून तयार करण्यात आलेला आहे हे मी जबाबदारीने बोलत आहे व याबाबत मी योग्य वेळी लवकरच वेगळा खुलासा करणार आहे.
तसेच चेअरमन व संचालक मंडळाचा दोन ते तीनच महिने कार्यकाळ राहिला असल्याने चेअरमन विस्तारवाढ
बाबत घाई का करत आहेत? का त्यांना त्यांचा कार्यकाळ संपण्या आगोदर विस्तारवाढीच्या काही ऑर्डर द्यायच्या आहेत का? लवकर ऑर्डर देवुन कुणाच हित साधणार आहात? की ज्याचा चालु गळीत हंगामात कोणताही फायदा।होणार नाही. तरी चेअरमन यांनी आत्ताची सभासदांची व कामगारांची दिवाळी गोड केलेलीच आहे. परंतु मी व माझी।कृती समिती सभासदांना फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देवु शकतो! तसेच चेअरमन यांनी शिल्लक राहिलेल्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात किमान आत्ता तरी कारखाना, सभासद व कामगार भविष्यात अडचणीत येणार नाही असे कारखान्याच्या हिताचे क्रांतिकारक निर्णय घेण्याची सदबुध्दी चेअरमन यांना मिळो.
विद्यमान संचालक मंडळातील काही संचालकांची आर्थिक परिस्थिती अचानक सुधारली आहे. त्याचा पर्दाफाश।कृती समितीच्या वतीने लवकरच करण्यात येणार आहे. तसेच विस्तारवाढी संदर्भात कृती समितीची जाहिर खुली चर्चा करण्याची तयारी आहे. ती तयारी संचालक मंडळाची आहे का?
सभासद उपाशी चेअरमन संचालक काजुशी!
कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने कोरोना महामारीच्या काळात सभादांच्या घामाच्या पैशातुन लाखो रूपयांचे ड्रायफुट्स (काजु, बदाम, पिस्ता, अंजिर, खारीक, मनुके, आकोड, केशर इत्यादी) फस्त केलेले आहेत. (याचा पुरवा माझ्याकडे आहे) असे जर घडत असेल तर सभासदांना कसा भाव मिळेल याचा सभासदांनी विचार काल साखर आयुक्त कार्यालयाकडुन माहिती मिळाल्यावर असे समजते की, चेअरमन यांनी स्वत:च दि. ३१/७/२०२० रोजीच गाळप हंगाम २०१९-२० चा अंतिम उस दर ३०००/- रू. प्रती मे.टन संचालक मंडळ व सभासदांना अंधारात ठेवुन फाईनल केला होता व त्याप्रमाणे विस्तारवादीचा प्रस्ताव आर्थिक पत्रकांसह साखर आयुक्त कार्यालयात सादर केला होता. तसेच जाणीव पुर्वक बॉयलर प्रतिपादन व मोळीपुजन कार्यक्रमात अंतिम उस दर ३०००/- रू. फाईनल केलेला असताना देखील तो संचालक मंडळास व सभासदांना सांगितले नाही हे मी.पुराव्यासह बोलत आहे.असे सतीश काकडे यांनी सांगितले आहे.
COMMENTS