ग्रामपंचायतच्या ग्रामसभा घेण्यास शासनाची परवानगी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
कोरोनाच्या काळात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा होऊ शकल्या नसल्याने शासनाने ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा मुंबई अधिनियम क्र . ३ ) च्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे अशाप्रकारे ग्रामसभेचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच , उपसरपंच , आणि ग्रामसेवक यांना जबाबदार घरून त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करणेची तरतूद आहे
कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासन आदेश ,अधिसूचना निर्गमित केल्या आहेत . या शासन आदेशानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभा व संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती सदर आदेश व कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभेमध्ये असणारी ग्रामस्थांची उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्दी ही आजाराच्या प्रार्दुभावाच्या दृष्टीने योग्य नाही . हि बाब विचारात घेता. संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये . ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली होती . सद्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निबंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने , संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्याबाबत निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
कोविड -१९ या आजाराचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्या कारणाने , गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सामाजिक व सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध करणारी नियमावली वेळोवेळी सार्वजनिक आरोग्य विभागाने तसेच केंद्र राज्य शासनाने शासन आदेश काढून निर्गमित केली होती. सदर आदेशांना अनुसरून विभागाने संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये , महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा मुंबई अधिनियम क्र.३) च्या कलम ७ नुसार, ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली होती.
आता, कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निबंधांमध्ये शिथिलता येत असून जनजीवन सुरळीत व पूर्वपदावर येत आहे . सदर बाब विचारात घेता, तसेच ग्राम विकासात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना असलेले अनन्य साधारण महत्व लक्षात घेता . ग्रामसभांचे पूर्वीप्रमाणे आयोजन होणे गरजेचे आहे . सबब, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना, त्यांच्या ग्रामसभा Social Distancing चे व कोविड -१९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत आहे. आता ग्रामसभा आयोजन कराव्या लागणार आहेत.
COMMENTS