बारामती तालुक्यातील सहा गावातील मेंढपाळाना सत्याएंशी हजार मंजूर

Admin
मोरगांव : प्रतिनिधी

बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील   सहा  गावांत   गेल्या तीन महीन्यात  शेळ्या मेंढ्यावर  लांडग्यांच्या कळपाचे हल्ले झाले होते. या बाधीत  शेतकऱ्यांना  सत्याएंशी हजार  रूपये  नुकसान भरपाई वनखात्याकडुन मंजुर झाली आहे . या धनादेशाचे वाट्प  आज  करण्यात आले .


तालुक्याच्या सहा   गावात गेल्या तीन  महीन्यात अन्नाच्या शोधार्थ  लांडग्याच्या कळपाने  शेळ्या मेंढ्या वाडग्यावर हल्ला चढवत शेळ्याव मेंढ्या  फस्त केल्या होत्या  . जोगवडी येथील ज्ञानेश्वर जयराम महानवर  , दादासो सूर्यकांत जाधव सोनवडी  , बाबासो दत्तात्रेय गाढवे आंबी , लक्ष्मण मल्हारी तांबे  व  लक्ष्मण नामदेव लकडे कोळोली ,  गणेश सोमा मोटे  रा .मोढवे  , देवीदास तात्याबा पिसाळ जळगाव या शेतकऱ्यांच्या शेळ्या - मेंढ्यांच्या  वाडग्यावर  लांडग्यांच्या कळपाने हल्ले केले होते   .  यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे . वनखात्याच्यावतीने वनपाल  अमोल पाचपुते , वनरक्षक शकुंतला गोऱ्हे ,  माया काळे यांनी सदर घटनेचे पंचनामे नोंद करुन वनखात्याला नुकसान भरपाईचे प्रस्ताव दाखल केले होते .
यानुसार उप  वनसंरक्षक राहुल पाटील  व साहाय्य  वनसंरक्षक मयूर बोठे  यांनी संबंधीत शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजुर केली आहे .  या भुकसान भरपाई धनादेशाचे वितरण चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांच्या हस्ते  करण्यात आले  यावेळी वनपाल अमोल पाचपुते  ,   बाधीत शेतकरी व वनकर्मचारी गणपत भोंडवे   आदी उपस्थित होते . उपस्थित शेतकऱ्यांनी वनखात्याने नुकसान भरपाई दिल्याबद्दल आभार व्यक्त केले .
To Top