सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
राज्यातील सहकारी साखर कामगारांसाठी अखेर १२ टक्के पगारवाढ करण्यात आली आहे. त्रिपक्षीय समितीच्या वारंवार पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
यामध्ये महागाई भत्ता २.७५ वरून २.९० करण्यात आला आहे. १२ टक्के पगारवाढ तसेच दि १ एप्रिल २०१९ पासून फरक देण्यात येणार असल्याची माहिती बारामती तालुका साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काकडे यांनी दिली. त्रिसमिती समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे तसेच सर्व सदस्यांनी यासाठी पाठपुरावा केला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे संघटनेच्या वतीने आभार मानन्यात आले.
COMMENTS