सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथील शुक्रवार दि . १५ रोजीचा मयुरेश्वराचा विजयादशमी पालखी सोहळा कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी बहुमताने घेतला . या दिवशी केवळ धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे .दसऱ्या निमित्ताने रावण दहन , फटाक्यांची आतषबाजी , भुईनळे उडविले जाणार नसून ग्रामस्थांनी व भावीकांनी मंदिर , परीसरात गर्दी न करण्याचे आवाहन सरपंच निलेश केदारी यांनी केले आहे .
मोरगावचा विजया दशमी सोहळा राज्यातील प्रसिद्ध सोहळ्यापैकी एक मानला जातो. या सोहळ्याला राज्या - परराज्यासह ,परदेशी नागरीकही हजेरी लावतात. या सोहळ्या निमित्ताने मयुरेश्वर मंदिर फरसावर आज दि. १३ रोजी सकाळी ९ वाजता समस्थ ग्रामस्थ , मानकरी , पुजारी आदींची बैठक संपन्न झाली . यामध्ये कोरोना या विषाणूजन्य आजाराचा वाढता फैलाव , खबरदारीचा उपाय म्हणून केवळ धार्मिकाच कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय बहुमताने निर्णय घेतला .
दसऱ्या निमित्ताने दरवर्षी घरोघरी भूईनळे उडवले जातात . स्वहस्ते गंधक , सोडा , कोळसा वापरून शोभेची दारु बनविली जाते . हे दारुकाम पालखी समोर उडवले जाते . मात्र आज दि . १३ रोजी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत केवळ धार्मिक कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच विजया दशमी निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रमही होणार नसल्याचे सरपंच केदारी यांनी सांगितले असून मंदिर व परीसरात गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .