सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
कोरोनामुळे मागील दोन वर्ष तर यंदा लालपरीच्या (एसटी) संपामुळे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२५ वा महोत्सवी संजीवन समाधी दिन सोहळा (आळंदीची कार्तिकी एकादशी) भोर तालुक्यातील हजारो वारकऱ्यांची चुकणार असल्याने माऊली तुमच्या भेटीला यावं कसं?अशी आर्त हाक वारकऱ्यांकडून दिली जात आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे मागील वर्षी लॉकडाऊन करण्यात आल्याने वारकऱ्यांची वारी बंद होती.लॉकडाऊनमध्ये शिथिलता केल्याने यंदा तरी आळंदी कार्तिकी एकादशी वारीला जाता येईल अशी आशा वारकऱ्यांना होती.मात्र एसटीचा संप सुरू असल्याने आळंदी वारीला जाण्यासाठी बसेस नाहीत.यामुळे यंदाही वारीला जाता येणार नाही याची खंत भोर तालुक्यातील वारकऱ्यांच्या मनात राहून गेली आहे.खाजगी वाहनांनी वारीला जाण्यासाठी काही वारकऱ्यांनी ठरविले असले तरी आर्थिक दृष्टया परवडणारे नसल्याने मोजकेच वारकरी कार्तिकी एकादशीला आळंदीला जाणार असल्याचे ह.भ.प आनंदा बढे यांनी सांगितले.
COMMENTS