सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
भोर : प्रतिनिधी
समाजातील चांगल्या - वाईट गोष्टी आपल्या लेखणीतून शासन- सरकार यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याची दखल ही संबधीत विभागाला घ्यावी लागते. म्हणून पञकार हा समाजाचा असतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी व्यक्त केली.
भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने येथे आद्य पत्रकार बाळ शास्त्री जांभेकर यांचे जयंती व पत्रकार दिनाचे निमित्ताने प्रांतधिकारी कचरे बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन पाटील याचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष वैभव भुतकर, उपाध्यक्ष संतोष म्हस्के,माणिक पवार ,संघटक दत्तात्रय बांदल,जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत किंद्रे, सभापती लहु शेलार, माजी अध्यक्ष भुजंगराव दाभाडे,सारंग शेटे,किरण भदे,जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत जाधव,विजय जाधव, निलेश खरमरे,स्वप्नील पैलवान,अर्जुन खोपडे,विलास मादगुडे, कुंदन जांजले उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्ट प्रशासकीय उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव (तत्कालीन प्रांताधिकारी,भोर),विशाल तनपुरे गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुर्यकांत कऱ्हाळे , मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली ,नसरापूर तसेच सामाजिक क्षेत्रातील स्वराज्य भूमी प्रतिष्ठान, तर आदर्श माता पुरस्कार मंदा शरद किंद्रे, संगिता नथू रसाळ, मनिषा यशवंत मोहरे ,विशेष सत्कार दिपाली जाधव ,प्रियांका भांडे (मिस महाराष्ट्र), सुप्रिया धुमाळ- ( गुन्हे अन्वेषण शाखेतील पहिली महिला श्वान प्रशिक्षक), प्रशांत रसाळ (सनदी लेखापाल), वैभव मोहरे (IES अधिकारी), स्वाती लहू शेलार ( प्रायोगिक शेतकरी), नगरपालिका कर्मचारी कोरोना काळात अंत्यविधीसाठी धाडस अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
COMMENTS