सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा प्रणालीअंतर्गत प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा सुमारे सव्वादोन टीएमसी अधिक पाणी असून समाधानकारक स्थिती असल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवर्तने सोडण्यास कोणतीही अडचण राहणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे जिल्हा विविध धरण प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीत पवार बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार समाधान अवताडे, शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते-पाटील, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, नीरा- भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, सांगोला सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक साळुंखे-पाटील, पाणीवापर संस्था प्रतिनिधी सुरेश पालवे-पाटील आदी उपस्थित होते.
COMMENTS