सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील महत्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यांची व पुलांची दुरवस्था झाल्याने वारंवार अपघात होत आहेत.त्याचे ताजे उदाहरण म्हणजे पांडे ता.भोर येथील तरुण नवदाम्पत्य दोन दिवसांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू पावले आहे. ह्या घटने प्रमाणेच या रोडवर गेल्या पाच ते दहा वर्षात अनेक जणांचा बळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे गेला आहे.लवकरात लवकर तालुक्यातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी दिला आहे.
पांडे गावातील साळुंखे परिवाराला या दांपत्याच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला आहे.भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष जीवन आप्पा कोंडे यांनी पांडे गावांमध्ये जाऊन साळुंखे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुनील वाघज यांच्याशी फोनवरून चर्चा करून तालुक्यातील रस्ते दुरुस्ती तसेच नादुरुस्त पुलांचे काम एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याची मागणी केली.याप्रसंगी भोर तालुका भाजपा पदाधिकारी बाळासाहेब गरुड, विश्वास ननावरे,राजेंद्र मोरे,राजेंद्र धडवे आणि सारोळा ,पांडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS