सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याने उशिरा तुटणाऱ्या उसाला अनुदान द्यावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती दिलीप खैरे यांनी सोमेश्वर कारखान्याकडे केली आहे.
खैरे यांनी कारखान्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याचे गाळप हंगाम सुरू होऊन जवळ पास तीन महिन्या पेक्षा अधिक काळ होऊन गेल्या नंतरही अद्याप सातव्या महिन्यातील ऊस तोडणी सुरू असून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांच्या उसाला मोठ्या प्रमाणात तुरे आल्याने उत्पादनात घट येत असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून विस्तारवाढ प्रथम डिसेंबर त्यानंतर जानेवारी त सुरु होणार असे व्यवस्थापन व आपण सांगत होतात त्यासाठी अधिकची तोडणी यंत्रणा सुरवाती पासूनच कार्यान्वित करण्यात आलेली होती त्यामुळे तोडलेला ऊस कारखाना कार्यस्थळावर वाहने दोन दोन दिवस उभी राहत असून तेथेही शेतकऱ्याचे नुकसान होत आहे शिवाय गट खाडे नसल्याने मजूर तोडणी वाहतूक यंत्रणा यांचे ही नुकसान होत आहे याबाबत आम्ही आपणास गाळप हंगाम सुरू होत असतानाच अतिरिक्त ऊस असल्याने नुकसान टाळण्यासाठी इतर कारखाना व्यवस्थापनाचे सोबत करार करून अतिरिक्त ऊस देण्या बाबत नियोजन करावे असे निवेदन देऊन विनंती केली होती परंतु आपण या विषयात विशेष लक्ष देण्याची गरज असतानाही त्याबाबत कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही वास्तविक विस्तारवाढीच्या विषयात संचालक मंडळ या विषयातील विरोधक आणि आपले नेते यांची भूमिका ही संशयास्पद असल्याचे दिसून येते गेली चार वर्षे पेक्षा अधिक काळ सभासद आपला ऊस गाळप होत नसल्याने इतर कारखान्याना देत असल्याने सभासद व आपली संस्था अश्या दोन्ही पातळीवर नुकसान होत असून यामधून सभासदांना कधी राहत मिळेल याबाबत तातडीने खुलासा करण्यात यावा तसेच तोडणी कार्यक्रमात सुधारणा करून विलंबाने तुटणाऱ्या उसाला नुकसान भरपाई, अनुदान देण्याची आवश्यकता असून त्यासाठी ही सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती
COMMENTS