सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
जेजुरी : प्रतिनिधी
इंग्रजांच्या विरुद्ध पहिला जाहीरनामा काढणारे छत्रपती उमाजी राजे नाईक होते आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांचे १९० व्या पुण्यतिथीनिमित्त बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार यांनी वरील वक्तव्य केले. युथ फाऊंडेशनच्या वतीने पुण्यतिथी कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा पुतळा व पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॕमेऱ्याचे देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे -पाटील संदीप आप्पा जगताप, यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यामुळे आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची सुरक्षा अबाधित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी पंकज निकुडे पाटील प्रमुख विश्वस्त मार्तंड देवसंस्थान, वीणाताई सोनवणे, संदीप अप्पा जगताप, राजाभाऊ चौधरी, जयवंत मदने , लक्ष्मण चव्हाण,जयदिप बारभाई , सुंदर तात्या खोमणे ,प्रसाद आत्रे ,मधुकर घाटे, जगन्नाथ बरकडे , आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रविकाका खोमणे , संदीप जगताप,जयदिप बारभाई, विणाताई सोनवणे, पंकज निकुडे , यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपटराव खोमणे यांनी केले. सूत्रसंचालन सागर चव्हाण यांनी केले. आभार माऊली खोमणे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन रविकाका खोमणे ,सुंदरतात्या खोमणे , शिवाजी चव्हाण , राजु खोमणे , मोहन खोमणे यांनी केले
COMMENTS