सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामाकरीता कारखान्याने आजअखेर ७ लाख ९४ हजार मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले असुन यातुन सरासरी ११.३८ टक्केचा साखर उतारा राखत ९ लाख ७०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. कार्यक्षेत्रातील वाढत्या ऊसक्षेत्राचा विचार करता कारखान्याने विस्तारवाढीचा निर्णय घेतला. विस्तारवाढीचे हे काम पूर्णत्वास येत असुन सोबतच पुढील परीस्थितीचा विचार करीता कारखान्याचे बॉयलर व टर्बाइन प्रकल्प विस्तारवाढ गरजेची असुन त्या अनुशंगाने सोमवार दि.२८/०२/२०२२ रोजी कारखान्याने विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, सध्या कार्यरत असलेल्या गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील सभासद व बीगर सभासदांना कारखान्याने प्रसारीत केलेला ऊस लागण कार्यक्रमानुसार विहीत मुदतीत लागवड केलेले अथवा खोडवा राखलेले ऊसक्षेत्र सुमारे ३६ हजार ८०० एकर एवढे होते. आजअखेर सुमारे अडीच हजार एकर आडसाली क्षेत्रातील जवळपास १ लाख २० हजार मे.टन, पुर्व हंगामी लागवडीचा ४६५० एकर क्षेत्रातील सुमारे १ लाख ७२ हजार मे.टन, सुरु हंगामातील ३१६१ एकर क्षेत्रामध्ये लागण झालेला सुमारे १ लाख मे.टन आणि गतवर्षी तुटलेल्या ऊसातुन राखलेल्या खोडवा पिकापासुन सुमारे ८२०० एकर क्षेत्रातील खोडवा पिकापासुन उपलब्ध होणारे २ लाख २७ हजार मे.ट्न याप्रमाणे १८ हजार ५०० एकर तोडीविना शिल्लक राहिलेल्या क्षेत्रातुन उपलब्ध होणार्या सुमारे ६ लाख मे.टन ऊसाचे गाळप करण्याचे आव्हान आपणासमोर असुन त्यासाठी संचालक मंडळ कसोशीने प्रयत्नशील आहे. सध्या कारखान्याचे गाळप क्षमता प्रतिदीन ६५०० मे. टन पेक्षा जास्त ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो असुन त्यामाध्यमातुन कार्यरत असलेल्या मीलद्वारे हंगाम संपेपर्यंत सुमारे १२ लाख ७५ हजार ते १३ लाख मे. टन गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. सन २०२१ च्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये प्रत्यक्ष कार्यवाही सुरु झालेला विस्तारवाढ प्रकल्प मार्च महिन्याच्या दुसर्या पंधरावड्यात कार्यरत करण्याचा आपला प्रयत्न असुन या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातुन सुमारे सव्वा लाख मे.टन गाळप करण्याचे आपले उद्दीष्ट्य आहे. अशा प्रकारे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद बीगर सभासदांनी कारखान्याकडे नोंदलेला ३६,८०० एकर क्षेत्रातील संपुर्ण ऊसाचे १५ पर्यंत गाळप करण्याचे संचालक मंडळाचे नियोजन आहे. यानंतरचा पुढील गळीत हंगाम प्रतिदीन ८ हजार मे. टन गाळप क्षमतेने कार्यरत राहणार असुन या गाळप हंगामामध्ये सुद्धा कारखान्याकडे विक्रमी ऊसाची गळीतासाठीची नोंद होईल असा अंदाज आहे.
जगताप पुढे म्हणाले की, आजअखेरपर्यंत पुढील गळीत हंगामासाठी दि.२०/२/२०२२ अखेर सुमारे ३७,२०० एकर उसक्षेत्राची नोंद झाली असुन खोडवा ऊसाच्या नोंदीसाठी परीपत्रकान्वये दिलेली २५/२/२०२२ पर्यंत तुटलेल्या ऊसाचा खोडवा राखण्याची मुदत वाढवुन ती ३१ मार्च २०२२ पर्यंत केलेली आहे. त्यामुळे सभासद ३१ मार्च २०२२ पर्यंत तुटणार्या ऊसाची खोडवा नोंद कारखान्याकडे करु शकतील.त्यामुळे आजअखेर नोंदलेल्या ३७,२०० एकर नोंदितुन उपलब्ध होणारा सुमारे १४ लाख ५० हजार मे.टन ऊस व खोडवा पिकाच्या वाढीव मुदतीमुळे खोडव्याचा ज्यादा १ लाख ५० हजार मे.टन ऊस असा एकुण मिळुन सुमारे १६ लाख मे.टन ऊस या येणार्या हंगामात उपलब्ध होईल. पुढील हंगामाकरीता नोंदलेल्या एकुण ऊसापैकी २० हजार आडसालीचीच नोंद आपल्याकडे झाली असुन आपली विस्तारवाढ होवुन ८ हजार प्रतिदीन कारखाना चालुनही आडसाली संपवण्यासच आपणास ४ महिने लागणार आहेत. नोंदलेल्या या संपुर्ण अतिरीक्त ज्यादा ऊसाचे गाळप करण्यासाठी पुढील हंगामात सुद्धा कारखाना गाळप क्षमता वाढीव असतानाही सुमारे २०० दिवस सुरु ठेवावा लागेल. कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम चालण्याच्या दृष्टीने कारखाण्याचा गळीत हंगाम कमीत कमी १६० दिवस व जास्तीत जास्त १८० दिवस चालणे योग्य मानले जाते. आपल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध होणार्या ऊसाचे गाळप या १६० ते १८० दिवसाच्या कालावधीमध्ये पुर्ण करता आले तरच आपला कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम राहिल व सभासदांना चढत्या ऊस भावांचे सातत्य राखु शकु. या सर्व बाबींचा सारासार विचार करुन आपण यापुर्वीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपले जुने १९६२ साली बसवलेले २० टनी दोन बॉयलर व १९८८ साली बसवलेला ४० टनी बॉयलर असए जुने ८० मे. टन स्टिमनिर्मिती क्षमता असलेले बॉयलर्स काढुन त्या जागेवर नवीन १०० मे.टन बॉयलर व १८ मेगावॅटचे टर्बाईन बसवण्याचे निर्णयाला यापुर्वीच मान्यता घेतलेली आहे. त्याकरीता सुमारे एकुण ८७ कोटी पर्यंत भांडवली खर्च करण्याची आवश्यकता असुन त्यासाठी सुमारे २६ कोटी रुपये स्वभांडवली निधी म्हणुन उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यातील सुमारे ६ कोटी रुपये सभासदांच्या या गळीत हंगामात गाळपास येणार्या ऊस बीलातुन शेअर्सच्या दर्शनी किंमतीमध्ये वाढिच्या माध्यमातुन उपलब्ध होणार असुन उर्वरीत २० कोटी रुपयांची आपण सन २०१७-१८ च्या गळीत हंगामामध्ये वाढाव्यातुन निर्माण केलेल्या चढउतार निधीची रक्कम प्रकल्प निधीकडे वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असुन तो सोमवार दि.२८/०२/२०२२ च्या विशेष सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी घेतला आहे.
सभासदांनी या विषयाला मान्यता दिल्यानंतर आपण आपल्या कारखान्याचे गाळप ९५०० हजार मे.टन क्षमतेपेक्षा जास्त करण्यात यशस्वी होणार असुन त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणारा अतिरीक्त ऊसाचा प्रश्न मिटण्यास हातभार लागणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सन २०२० मध्ये जाहिर केलेल्या वीज खरेदी धोरणानुसार राज्यातील कारखान्यांच्या सहविजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी सुमारे १३५० मेगावॅट विज खरेदी करणेचे निर्देश महापारेषणला दिलेले आहेत. त्यानुसार मार्च २०२५ पर्यंत पुर्ण होणार्या प्रकल्पांचेच वीजखरेदी करार करुन घेण्याचे शासनाचे धोरण आहे. सदरची वीज ४ रुपये ७५ पैसे प्रति युनिट या दराने खरेदी करण्यात येणार असुन आपल्या प्रकल्पामधुन निर्यात होणार्या सुमारे १३ मेगावॅट वाढीव वीजेला या दराचा लाभ - घेता येईल. या माध्यमातुन सुमारे ३० ते ३५ कोटींचे प्रतिवर्षी ज्यादा उत्पन्न कारखान्यास मिळणार असुन त्या माध्यमातुन प्रकल्पासाठी होणारा खर्च ३ ते ४ वर्षात परतफेड होणार आहे. आपला हा प्रकल्प पुर्ण होताच नजीकच्या काळात डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प विस्तारवाढ आपण हातात घेणार आहोत. सध्याच्या परीस्थितीचा विचार करीता उन्हाळ्यात कमी पडत जाणारी ऊसाची रिकव्हरी, ऊसतोड मजुरांची कमीची उपलब्धता, सर्व तांत्रिक रिझल्ट, कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी सर्वच कारखान्यांची सुरु असणारी स्पर्धा, अधिकचा ऊसदर या सर्वच बाबींवर आपल्याला भविष्यात आघाडी घेण्यासाठी आपण सहविजनिर्मिती विस्तारवाढीचा निर्णय घेतला असुन बॉयलर व टर्बाइन विस्तारवाढ प्रकल्पाकरीता सर्व सभासदांचा निश्चित पाठींबा राहिल असा विश्वास मी व्यक्त करतो.
COMMENTS