सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
किसनवीर सहकारि साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत आज अखेर ९ अर्ज प्राप्त झाले असुन तब्बल २३९ अर्जांची विक्री झाली आहे. शुक्रवार दि. १ एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने दोन दिवसात ईच्छुकांना अर्ज दाखल करावे लागणार आहेत.
वाई, खंडाळा, जावली, सातारा व कोरेगाव अशा पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग वाजले असून दिनांक २८ रोजी ३४, दि. २९ रोजी ५९ तर दि. ३० रोजी १४६ अर्जांची अशी एकूण २३९ अर्जांची विक्री झाली आहे. आजपर्यंत भुईंज गटातून ४ अर्ज, वाई बावधन जावली गटातून १ अर्ज, सातारा गटातून २ अर्ज, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ २ अर्ज असे एकूण ९ अर्ज प्राप्त झाल्या आहेत.
अर्जाची छाननी ४ एप्रिल रोजी तर चिन्हवाटप ५ एप्रिल रोजी होणार असून गरज पडल्यास ३ मे रोजी मतदान होणार आहे. तर ५ मे रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तालुक्यातील सुमारे दीडशे मतदान केंद्रावर मतदान होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणपत खानकर यांनी दिली आहे .
COMMENTS